शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:48 IST

ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा महाविकास आघाडीच्या सरकाराला विसर पडला असून ह्या लबाड सरकारकडून रोज शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त तालुका, नक्षलग्रस्त जिल्हा आणि कायम  दुष्काळी तालुक्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना सुरु केली होती आणि त्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात आले होते. मात्र आता या सरकारने त्याची सबसिडी थांबवून ठेवली आहे. तर ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.

तर फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीला शिवसेनेचा,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला होता. मात्र आता त्यांनी केलेल्या कर्जमाफी योजनेत मध्यम मुदती कर्ज घेतले गेलं नाही. कर्ज माफीची यादी समोर आल्यावर हे सगळ स्पष्ट होणार आहे. अवकाळी पाऊस झाल्यावर 25 हजारांची मागणी करणारे हेच लोकं आता सत्तेत आल्यावर ती मदत देण्याचे विसरले. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करू म्हणणारे आता त्यांना चिंतेत टाकत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.