शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:48 IST

ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा महाविकास आघाडीच्या सरकाराला विसर पडला असून ह्या लबाड सरकारकडून रोज शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त तालुका, नक्षलग्रस्त जिल्हा आणि कायम  दुष्काळी तालुक्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना सुरु केली होती आणि त्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात आले होते. मात्र आता या सरकारने त्याची सबसिडी थांबवून ठेवली आहे. तर ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.

तर फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीला शिवसेनेचा,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला होता. मात्र आता त्यांनी केलेल्या कर्जमाफी योजनेत मध्यम मुदती कर्ज घेतले गेलं नाही. कर्ज माफीची यादी समोर आल्यावर हे सगळ स्पष्ट होणार आहे. अवकाळी पाऊस झाल्यावर 25 हजारांची मागणी करणारे हेच लोकं आता सत्तेत आल्यावर ती मदत देण्याचे विसरले. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करू म्हणणारे आता त्यांना चिंतेत टाकत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.