शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

...नाहीतर शेतकऱ्याला गांजा, अफू लावायला परवानगी द्या; कांदाप्रश्नी सदाभाऊ खोत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 20:38 IST

जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला तर कुणी मेलंय का? असा सवालही सदाभाऊंनी विचारला.

मुंबई – कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता केंद्राने कांदा निर्यातीवरील शुल्क मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यात सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या निर्णयावरून संतप्त भूमिका घेतली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळत असताना हा निर्णय झाला. शेतकऱ्याने शेती करायची की नाही हे सरकारने धोरण तयार करावे. शेतकऱ्यांचा शेतमाल फुकट खायचा असेल तर शेतजमीन सरकारने ताब्यात घ्यावी आणि मंत्रालयातील क्लार्कप्रमाणे शेतकरी कुटुंबाला महिन्याला पगार द्यावा. ते जमणार नसेल तर शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या. आम्ही धान्य पिकवायचे बंद करतो, तुम्हाला कुणाच्या शेतात धान्यपिके पिकवायची असेल तिकडे पिकवा असं त्यांनी म्हटलं.

तसेच जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला तर कुणी मेलंय का? ज्या ज्या वेळी २ पैसे शेतकऱ्याला जास्त मिळाले तर शेतकऱ्याचे खळे त्याच्या डोळ्यादेखत लुटलं जातंय हे कुठेतरी बंद व्हायला हवे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने माजी प्रदेशाध्यक्ष दिल्लीत गेले, ते उद्या निवेदन देतील. परंतु पुढील महिन्यात आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकपासून आंदोलनाला सुरुवात करतोय असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. दरम्यान, सरकारला या शेतकऱ्याला काही देता येत नसेल तर देऊ नका, परंतु त्याच्या अन्नामध्ये कृपा करून माती कालवू नका असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी सरकारला केले.

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - मंत्री

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. ही संपाची कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार- केंद्राशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी अजबच सल्ला दिला. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असेच भुसे यांनी म्हटले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत