शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

...नाहीतर शेतकऱ्याला गांजा, अफू लावायला परवानगी द्या; कांदाप्रश्नी सदाभाऊ खोत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 20:38 IST

जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला तर कुणी मेलंय का? असा सवालही सदाभाऊंनी विचारला.

मुंबई – कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता केंद्राने कांदा निर्यातीवरील शुल्क मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विरोधकांनीही या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यात सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या निर्णयावरून संतप्त भूमिका घेतली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कांद्याला दोन पैसे जास्त मिळत असताना हा निर्णय झाला. शेतकऱ्याने शेती करायची की नाही हे सरकारने धोरण तयार करावे. शेतकऱ्यांचा शेतमाल फुकट खायचा असेल तर शेतजमीन सरकारने ताब्यात घ्यावी आणि मंत्रालयातील क्लार्कप्रमाणे शेतकरी कुटुंबाला महिन्याला पगार द्यावा. ते जमणार नसेल तर शेतकऱ्याला गांजा, अफू लावायची परवानगी द्या. आम्ही धान्य पिकवायचे बंद करतो, तुम्हाला कुणाच्या शेतात धान्यपिके पिकवायची असेल तिकडे पिकवा असं त्यांनी म्हटलं.

तसेच जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला तर कुणी मेलंय का? ज्या ज्या वेळी २ पैसे शेतकऱ्याला जास्त मिळाले तर शेतकऱ्याचे खळे त्याच्या डोळ्यादेखत लुटलं जातंय हे कुठेतरी बंद व्हायला हवे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने माजी प्रदेशाध्यक्ष दिल्लीत गेले, ते उद्या निवेदन देतील. परंतु पुढील महिन्यात आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकपासून आंदोलनाला सुरुवात करतोय असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. दरम्यान, सरकारला या शेतकऱ्याला काही देता येत नसेल तर देऊ नका, परंतु त्याच्या अन्नामध्ये कृपा करून माती कालवू नका असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी सरकारला केले.

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका - मंत्री

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा दर कोसळतील ही भीती व्यापारी आणि शेतकऱ्यांना असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. ही संपाची कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार- केंद्राशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी अजबच सल्ला दिला. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असेच भुसे यांनी म्हटले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत