शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड, लोड शेडींग विरोधात असंतोष; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 06:09 IST

भंडारा/बीड/अहमदनगर : राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. ...

भंडारा/बीड/अहमदनगर :

राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. भंडारा जिल्ह्यात वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करत तोडफोड केल्याची घटना घडली असून अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एक तास रस्त्यावरच ठिय्या दिला, तर बीड जिल्ह्यात पक्ष, संघटनांनी वीज वितरण कार्यालयांपुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रात तोडफोड केल्याची घटना पवनी तालुक्यातील आसगाव (भंडारा) येथे बुधवारी घडली. याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले. आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त  आहेत.

लोडशेडिंगवरून बीडमध्ये संतापमहावितरणने अचानक सुरू केलेल्या लोडशेडिंगविरोधात जिल्हाभरात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वीज प्रश्नावर भाजपचे तीन आमदार आक्रमक झाले असून इतर पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केज, अंबाजोगाई तालुक्यात वसुली चांगली आणि वीजचोरी नसताना भारनियमन का? असा सवाल आ. नमिता मुंदडा यांनी केला. गेवराईत आ. लक्ष्मण पवार यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले तर आष्टीत आ. सुरेश धस यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. गेवराईत वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला.

बळजबरीने सुरू केला वीजपुरवठावीज वितरण उपकेंद्रात धडकलेल्या शेतकऱ्यांनी बळजबरीने वीजपुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ११ केव्ही आसगाव, ढोलसर, खैरी कृषी फिडरवर वीजपुरवठा सुरू करून वाहिनी बंद केली, तर आम्ही पुन्हा येऊ आणि तोडफोड करू, अशी धमकी दिली.

शेतकऱ्यांचा तासभर रस्त्यावरच ठिय्या- शिरूर-जवळे-निघोज मुख्य रस्त्यावर जवळे (ता. पारनेर) येथील बसस्थानकासमोर वीजप्रश्नी शेतकऱ्यांसह भाजपच्यावतीने एक तास रस्त्यावरच ठिय्या देण्यात आला. आंदोलनात पारनेर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. - भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, भारनियमनासाठी आघाडी सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. विहिरीत पाणी असूनही वीजटंचाईमुळे शेतकऱ्यांची उभे पिके जळून चालली आहेत. आठ दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुणे-नगर महामार्ग गव्हाणेवाडी आम्ही शेतकऱ्यांसह रोखण्याचा इशारा कोरडे यांनी दिला.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनelectricityवीज