शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

शेतकरी संतापला! वीज उपकेंद्रात केली तोडफोड, लोड शेडींग विरोधात असंतोष; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 06:09 IST

भंडारा/बीड/अहमदनगर : राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. ...

भंडारा/बीड/अहमदनगर :

राज्यातील अघोषित भारनियमनाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून शेतकरी आक्रमक झाल्याच्या अनेक घटना गुरुवारी राज्यात घडल्या. भंडारा जिल्ह्यात वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करत तोडफोड केल्याची घटना घडली असून अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एक तास रस्त्यावरच ठिय्या दिला, तर बीड जिल्ह्यात पक्ष, संघटनांनी वीज वितरण कार्यालयांपुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रात तोडफोड केल्याची घटना पवनी तालुक्यातील आसगाव (भंडारा) येथे बुधवारी घडली. याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले. आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने शेतकरी संतप्त  आहेत.

लोडशेडिंगवरून बीडमध्ये संतापमहावितरणने अचानक सुरू केलेल्या लोडशेडिंगविरोधात जिल्हाभरात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. वीज प्रश्नावर भाजपचे तीन आमदार आक्रमक झाले असून इतर पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. केज, अंबाजोगाई तालुक्यात वसुली चांगली आणि वीजचोरी नसताना भारनियमन का? असा सवाल आ. नमिता मुंदडा यांनी केला. गेवराईत आ. लक्ष्मण पवार यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले तर आष्टीत आ. सुरेश धस यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. गेवराईत वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला.

बळजबरीने सुरू केला वीजपुरवठावीज वितरण उपकेंद्रात धडकलेल्या शेतकऱ्यांनी बळजबरीने वीजपुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ११ केव्ही आसगाव, ढोलसर, खैरी कृषी फिडरवर वीजपुरवठा सुरू करून वाहिनी बंद केली, तर आम्ही पुन्हा येऊ आणि तोडफोड करू, अशी धमकी दिली.

शेतकऱ्यांचा तासभर रस्त्यावरच ठिय्या- शिरूर-जवळे-निघोज मुख्य रस्त्यावर जवळे (ता. पारनेर) येथील बसस्थानकासमोर वीजप्रश्नी शेतकऱ्यांसह भाजपच्यावतीने एक तास रस्त्यावरच ठिय्या देण्यात आला. आंदोलनात पारनेर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. - भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, भारनियमनासाठी आघाडी सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. विहिरीत पाणी असूनही वीजटंचाईमुळे शेतकऱ्यांची उभे पिके जळून चालली आहेत. आठ दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुणे-नगर महामार्ग गव्हाणेवाडी आम्ही शेतकऱ्यांसह रोखण्याचा इशारा कोरडे यांनी दिला.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनelectricityवीज