शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर! सुकाणू समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 21:50 IST

सरसकट कर्जमाफीपासून टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्याच्या फसव्या घोषणा करणाºया सरकारचे श्राद्ध घालून, ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मंगळवारी दिला आहे.

 मुंबई -  सरसकट कर्जमाफीपासून टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्याच्या फसव्या घोषणा करणाºया सरकारचे श्राद्ध घालून, ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मंगळवारी दिला आहे. मुंबई मराठीपत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली, शिवाय नोव्हेंबर महिन्यात सरकारचे श्राद्ध घालून ‘जेलभरो’ आंदोलनाची घोषणा केली आहे.शब्दांचे खेळ करणारे सरकार हमीभाव ठरविण्यात आणि कर्जमाफी देण्यात वेळकाढूपणा करत असल्याचे सुकाणू समितीचे निमंत्रक डॉ.अजित नवले यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकारच्या विरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावरउतरणार आहेत. सरकारने ८९ लाख शेतक-यांना कर्जमुक्तीचा फायदा देण्याची घोषणा केली. मात्र, अर्ज भरताना समाविष्ट केलेल्या जाचक अटींमुळे केवळ ५५ लाख अर्जच दाखल झाले. सरकारने जाणीवपूर्वक ३४ लाख शेतकºयांनाकर्जमाफीपासून दूर केले. त्यातही प्रत्यक्षात २ लाख ३७ हजार शेतक-यांनाच मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप केले आहे. म्हणजेच केवळ ३ टक्के शेतक-यांना कर्जमुक्तीचा फायदा मिळत असून, लाखो शेतकरी कर्जमुक्तीपासून दूरच आहेत. एकंदरीतच सरकारने ऐतिहासिक कर्जमुक्तीचा दावा केला. मात्र, अटी व शर्थींमुळे शेतकºयांना न्याय मिळालेला नाही.ज्येष्ठ नेते बाबा आढाव म्हणाले की, नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबरला सरकारचे राज्यभर श्राद्ध घातले जाईल, तर संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळावा, म्हणून १० नोव्हेंबरला प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चे काढले जातील. या वेळी शेतकरी हमीभाव न मिळालेला शेतमाल शासनाच्या दारात ओतून निषेध व्यक्त करेल. सोबतच तहसील कार्यालयाबाहेर घंटानाद करून, सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न करेल, तरी सरकारने जाचक अटी रद्द करत सरसकट कर्जमाफी देण्याची एकमुखी मागणी सर्व नेत्यांनी केली. वीजकंपन्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार!शेतक-यांमध्ये नाराजीची भावना असून, वीजभरणा न करणा-या शेतक-यांची वीजजोडणी तोडण्यास सरकारने सुरुवात केली आहे. मात्र, १ नोव्हेंबरपासून वीजतोडणी करणा-या कंपन्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून, शेतकरी स्वत:चवीजजोडणी करतील, असा इशारा शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे. ...तर जेलभरो१ नोव्हेंबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत केलेल्या विविध आंदोलनानंतरही सरकार वठणीवर आले नाही, तर पुढच्या टप्प्यात हजारो शेतकरी गावोगावी ‘जेलभरो’ आंदोलन करतील, असा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. मुंबईसह शहरांतीलनागरिकांनी या वेळी बघ्याची भूमिका घेऊ नये. सर्वांनी शेतकरी आंदोलनात सामील होण्याचे आवाहनही सुकाणू समितीने केले आहे.या आहेत शेतक-यांच्या प्रमुख मागण्या- सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा.- वीज बिलाची बेकायदेशीर वसुली थांबवत वीजबिल माफी द्या.- शेतक-यांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घ्या.- दूध व्यवसायाला ७०:३० चे सूत्र लागू करून दुधाच्या दरात वाढ करा.- कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकºयांना किमान १० लाख रुपयेभरपाई देऊन ठोस उपाययोजना करा.- उत्पादन खर्च पाहता उसाला किमान ३ हजार ५०० रुपये प्रतिटन भाव द्यावा.- सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये किमान हमीभाव जाहीर केला असतानाही १ हजार९०० ते २ हजार ६०० रुपये दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आधारभूतखरेदी केंद्र सुरू करा.

टॅग्स :Farmerशेतकरी