शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकरी महिलेचा विमा दावा नाकारणाऱ्या कंपनीला दणका; २ लाख रुपये भरपाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:24 IST

विम्याचे २ लाख रुपये व्याजासह देण्याचे ग्राहक आयोगाचे निर्देश, विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वयाची पुष्टी करणारी कोणतीही कागदपत्रे नसताना एकतर्फी विमा दावा फेटाळला होता

मुंबई : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला विम्याचे पैसे नाकारणाऱ्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. विम्याचे २ लाख रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचे निर्देश ग्राहक आयोगाने दिले आहेत, तसेच या तक्रारीच्या मानसिक त्रासापोटी २० हजार रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी पत्नीला दिलासा मिळाला आहे. 

तक्रारदार शेतकरी महिलेच्या पतीचा मृत्यू भाजी मंडईतून घरी परतत असताना राज्य परिवहन विभागाच्या बसने दिलेल्या धडकेमुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये झाला होता. त्यांची राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’अंतर्गत पॉलिसी काढण्यात आली होती. ओरियंटल इन्श्युरन्स कंपनीमार्फत विमा काढण्यात आला होता. मृत शेतकऱ्याचे वय ७५ पेक्षा अधिक आहे, तसेच विमा दावा निहित मुदतीत करण्यात आला नाही, अशी कारणे देऊन विमा कंपनीने तक्रारदार शेतकरी पत्नीला विम्म्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. याविरोधात पीडित महिलेने ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

मनमानी पद्धतीने दावा नाकारल्याचा ठपका

या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. त्यामध्ये मयत शेतकऱ्याचा जन्म १९७२ मध्ये झाल्याचे नमूद केले होते, तर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात मयत व्यक्तीचे वय जवळपास ७० वर्षे नमूद करण्यात आले होते. मात्र, विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वयाची पुष्टी करणारी कोणतीही कागदपत्रे नसताना एकतर्फी विमा दावा फेटाळला होता. त्यामुळे पुराव्यांअभावी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे शेतकऱ्याचे वय ७० असल्याचे आयोगाने त्यांच्या निवाड्यात नमूद केले. दरम्यान, वैध कारणे असल्यास ९० दिवस उलटून गेल्यानंतरही आलेल्या विमा दाव्यांचे निराकरण करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. 

त्यामुळे या प्रकरणात विमा कंपनीने मनमानी पद्धतीने तक्रारदार महिलाचा दावा नाकारल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. त्यानुसार आयोगाने जून २०१८ पासून वार्षिक ६ टक्के व्याजाने २ लाख रुपये देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले आहेत. त्याचबरोबर तक्रारदार महिलेला मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी ५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.