शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शेतकरी महिलेचा विमा दावा नाकारणाऱ्या कंपनीला दणका; २ लाख रुपये भरपाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 10:24 IST

विम्याचे २ लाख रुपये व्याजासह देण्याचे ग्राहक आयोगाचे निर्देश, विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वयाची पुष्टी करणारी कोणतीही कागदपत्रे नसताना एकतर्फी विमा दावा फेटाळला होता

मुंबई : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला विम्याचे पैसे नाकारणाऱ्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. विम्याचे २ लाख रुपये ६ टक्के व्याजासह देण्याचे निर्देश ग्राहक आयोगाने दिले आहेत, तसेच या तक्रारीच्या मानसिक त्रासापोटी २० हजार रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी पत्नीला दिलासा मिळाला आहे. 

तक्रारदार शेतकरी महिलेच्या पतीचा मृत्यू भाजी मंडईतून घरी परतत असताना राज्य परिवहन विभागाच्या बसने दिलेल्या धडकेमुळे नोव्हेंबर २०१७ मध्ये झाला होता. त्यांची राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’अंतर्गत पॉलिसी काढण्यात आली होती. ओरियंटल इन्श्युरन्स कंपनीमार्फत विमा काढण्यात आला होता. मृत शेतकऱ्याचे वय ७५ पेक्षा अधिक आहे, तसेच विमा दावा निहित मुदतीत करण्यात आला नाही, अशी कारणे देऊन विमा कंपनीने तक्रारदार शेतकरी पत्नीला विम्म्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. याविरोधात पीडित महिलेने ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

मनमानी पद्धतीने दावा नाकारल्याचा ठपका

या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. त्यामध्ये मयत शेतकऱ्याचा जन्म १९७२ मध्ये झाल्याचे नमूद केले होते, तर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात मयत व्यक्तीचे वय जवळपास ७० वर्षे नमूद करण्यात आले होते. मात्र, विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वयाची पुष्टी करणारी कोणतीही कागदपत्रे नसताना एकतर्फी विमा दावा फेटाळला होता. त्यामुळे पुराव्यांअभावी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे शेतकऱ्याचे वय ७० असल्याचे आयोगाने त्यांच्या निवाड्यात नमूद केले. दरम्यान, वैध कारणे असल्यास ९० दिवस उलटून गेल्यानंतरही आलेल्या विमा दाव्यांचे निराकरण करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. 

त्यामुळे या प्रकरणात विमा कंपनीने मनमानी पद्धतीने तक्रारदार महिलाचा दावा नाकारल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. त्यानुसार आयोगाने जून २०१८ पासून वार्षिक ६ टक्के व्याजाने २ लाख रुपये देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले आहेत. त्याचबरोबर तक्रारदार महिलेला मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी ५ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.