शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 16:04 IST

शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत.

बारामती : कृषि कायद्यामध्ये जरुर सुधारणा सुचवाव्यात,मात्र, हे कायदे रद्द झाल्यास शेतकऱ्याच्या पायातील बेड्या सुटणार नाहीत. कायदे मागे घेण्यासाठी सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्याला गुलाम बनवुन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी सुरु आहे. शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत अशी टीका शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे.  काही नक्षलवादी विचारसरणीचे दहशतवाद माजविणारे यामध्ये घुसले आहेत.परंतु महाराष्ट्रातील जनता,इतर राज्य मोदींच्या मागे असल्याचा दावा शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला.

बारामती येथे खोत हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी (दि २) आले होते.यावेळीअशी टीका शेतकरी नेते  न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खोत पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या नावाने काहीजण गळे काढत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना काय वागणुक दिली याचा तपास करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे जाणते नेते पुतनामावशीचे प्रेम दाखवतात,असा टोला शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी लगावला.

शेतकरी नेते शरद जोशी आणि महेंद्रसिंग टीकेत यांनी ३२ वर्षापुर्वी दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी  आंदोलन उभे केले होते.त्यावेळी महेद्रसिंग टीकेत यांनी गुंडागर्दी करणारे लोक हाताशी धरत जोशी ना व्यासपीठावरुन ढकलुन दिले.सरकारने आंदोलन मोडीत काढले.त्यावेळी लाखो शेतकरी त्यावेळी माघारी परतला.राकेश टिकेत यांच्या डोळ्यातील अश्रु पाहुन मला या घटनेची आठवण झाली. जातीवंत शेतकरी दंगा करु शकत नाही,या मताशी मी सहमत आहेत. मात्र, राकेश टीकेत त्यांच्या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला तिलांजली देत आहेत. भावनेवर लोक जमा झाले आहेत.मात्र, हे लोक शेतकऱ्यांचे बाजारपेठेच स्वातंत्र्य हिरावुन घेत आहेत.

कृषि कायद्यात सुधारणा व्हावी,ही भूमिका रयत क्रांती संघटनेचा शेतकरी नेता म्हणुन आहे.अत्यावश्यक वस्तु कायदा पूर्ण रद्द करा, शेतमाल निर्यातीवर बंधन लावु नका,अनावश्यक शेतीमान आयात रद्द करा,आदी  आमच्या मागण्या असल्याची भूमिका खोत यांनी केली.

 

टॅग्स :BaramatiबारामतीSadabhau Khotसदाभाउ खोत delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारSharad Pawarशरद पवार