शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!
3
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
4
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
5
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys, Wipro टॉप लूझर्स
6
महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका
7
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
8
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
9
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
10
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
11
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
12
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
14
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
15
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
16
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
17
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
18
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
19
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
20
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त

By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST

शरद पवार : विट्यात अमरसिंह देशमुख यांच्या प्रचार सभेत भाजपवर टीका

आटपाडी : परदेशात जाणाऱ्या साखरेचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. कांदा, डाळिंबाची निर्यात थांबवली आहे. दुधाची पावडरही निर्यात होऊ न देण्याची भाजपची नीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.विटा येथे आज (रविवारी) राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमरसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अशोकराव गायकवाड, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. पवार म्हणाले की, अवघ्या तीन महिन्यात मोदींना लोकसभेसाठी साथ दिल्याची चूक लोकांच्या आता लक्षात आली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अवघ्या दोन जागा निवडून आल्या, मात्र पोटनिवडणुकीत भाजपचा ९ पैकी ८ जागांवर पराभव झाला. मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातमधून अजून बाहेर पडायला तयार नाहीत. जो माणूस देशाचे नेतृत्व करतो, पण आपल्याला मानत नाही, त्याच्या हाती सत्ता सोपविण्याची चूक येथील जनता कदापि करणार नाही. महाराष्ट्र हे गुंडांचे, दरोडेखोरांचे राज्य आहे, अशी जाहिरात भाजप करत आहे. महाराष्ट्राची बेईज्जत भाजपएवढी कुणी केली नाही. या भागातील टेंभू योजनेसह दुष्काळासारख्या प्रत्येक संकटात आम्ही साथ दिली. नव्या पिढीतील अमरसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. आर. आर. पाटील म्हणाले की, मोदी प्रचारासाठी आज तासगावला आले, नगरपालिका निवडणुकीतसुद्धा ते येतील. शेतकऱ्यांच्या मालाचे दर वाढू नयेत यासाठी उद्योगपतींच्या वस्तूंचे दर वाढवत आहेत. जयंत पाटील म्हणाले की, स्वत:च्या ताकदीवर निवडून येत नाही म्हटल्यावर बाबर पक्ष सोडून गेले.  अमरसिंह देशमुख म्हणाले की, उंबरगाव ते बोरगावपर्यंतचे सगळे प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिले आहेत. यावेळी किरण माने, विलासराव शिंदे, अरुण लाड, हणमंतराव देशमुख, सभापती अलका भोसले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)भाजपचा राज्याचे तुकडे करण्याचा डाव मतांच्या जोगव्यासाठी केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहे. जनता ते कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी जत येथील सभेत दिला. ते म्हणाले की, देशात सर्वाधिक जादा आत्महत्या महाराष्ट्रात नव्हे, तर गुजरातमध्ये झाल्या आहेत. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आज त्यांनी जाणूनबुजून तासगावात सभा घेतली आहे. परंतु आर. आर. यांचे कर्तृत्व उत्तुंग असल्याने तेच विजयी होतील.