शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त

By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST

शरद पवार : विट्यात अमरसिंह देशमुख यांच्या प्रचार सभेत भाजपवर टीका

आटपाडी : परदेशात जाणाऱ्या साखरेचे अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे. कांदा, डाळिंबाची निर्यात थांबवली आहे. दुधाची पावडरही निर्यात होऊ न देण्याची भाजपची नीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.विटा येथे आज (रविवारी) राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमरसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अशोकराव गायकवाड, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. पवार म्हणाले की, अवघ्या तीन महिन्यात मोदींना लोकसभेसाठी साथ दिल्याची चूक लोकांच्या आता लक्षात आली आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अवघ्या दोन जागा निवडून आल्या, मात्र पोटनिवडणुकीत भाजपचा ९ पैकी ८ जागांवर पराभव झाला. मोदी पंतप्रधान झाले तरी गुजरातमधून अजून बाहेर पडायला तयार नाहीत. जो माणूस देशाचे नेतृत्व करतो, पण आपल्याला मानत नाही, त्याच्या हाती सत्ता सोपविण्याची चूक येथील जनता कदापि करणार नाही. महाराष्ट्र हे गुंडांचे, दरोडेखोरांचे राज्य आहे, अशी जाहिरात भाजप करत आहे. महाराष्ट्राची बेईज्जत भाजपएवढी कुणी केली नाही. या भागातील टेंभू योजनेसह दुष्काळासारख्या प्रत्येक संकटात आम्ही साथ दिली. नव्या पिढीतील अमरसिंह देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. आर. आर. पाटील म्हणाले की, मोदी प्रचारासाठी आज तासगावला आले, नगरपालिका निवडणुकीतसुद्धा ते येतील. शेतकऱ्यांच्या मालाचे दर वाढू नयेत यासाठी उद्योगपतींच्या वस्तूंचे दर वाढवत आहेत. जयंत पाटील म्हणाले की, स्वत:च्या ताकदीवर निवडून येत नाही म्हटल्यावर बाबर पक्ष सोडून गेले.  अमरसिंह देशमुख म्हणाले की, उंबरगाव ते बोरगावपर्यंतचे सगळे प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिले आहेत. यावेळी किरण माने, विलासराव शिंदे, अरुण लाड, हणमंतराव देशमुख, सभापती अलका भोसले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)भाजपचा राज्याचे तुकडे करण्याचा डाव मतांच्या जोगव्यासाठी केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहे. जनता ते कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी जत येथील सभेत दिला. ते म्हणाले की, देशात सर्वाधिक जादा आत्महत्या महाराष्ट्रात नव्हे, तर गुजरातमध्ये झाल्या आहेत. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आज त्यांनी जाणूनबुजून तासगावात सभा घेतली आहे. परंतु आर. आर. यांचे कर्तृत्व उत्तुंग असल्याने तेच विजयी होतील.