शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेतकरी कृषी उत्पादक कंपन्या करणार कांदा खरेदी : महा-एफपीसीचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:53 IST

गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातील कांद्याचे भाव कोसळत आहेत. काही ठिकाणी अगदी ५ रुपये किलोपर्यंत बाजार भाव आहेत.

ठळक मुद्देदोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदीचा संकल्प राज्यात २५ हजार टन क्षमतेचे साठवणूक केंद्र उभारणारपहिल्या टप्प्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद आणि बीड येथे खरेदी केंद्र आंतरराज्य व्यापाराला चालना देण्यासाठी वाहतूक आणि साठवणुकीचे अनुदान देण्यात येणार

पुणे : कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर माल टाकून देऊ लागले आहेत. त्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर रोखण्यासाठी शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतला असून, येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा संकल्प त्यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सोडला. त्यामुळे, बळीराजाच्या मदतीला बळीराजानेच स्थापन केलेल्या कंपन्या धावून आल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारातील कांद्याचे भाव कोसळत आहेत. काही ठिकाणी अगदी ५ रुपये किलोपर्यंत बाजार भाव आहेत. सोमवारी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतवारीनुसार क्विंटलमागे ४०० ते ११०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याला भाव मिळत नसल्याने मोफत कांदा वाटपाचे आंदोलनही शेतकऱ्यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी पुण्यात झाली. त्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदी करुन तो कांदा लागवड कमी असलेल्या अथवा नसलेल्या ठिकाणी विकावा असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महा-एफपीसीच्या वतीने देण्यात आली.शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने कांद्याच्या आंतरराज्य व्यापारासाठी विक्री साखळी उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद आणि बीड येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील. त्यानंतर कांदा उत्पादन नसणाºया राज्यात त्याची विक्री केली जाईल. चेन्नई येथे दक्षिण भारतातील व्यापार केंद्र सुरु करण्यात आले असून, घाऊक बाजार अणि संस्थात्मक खरेदीसाठी व्यापार सुरु करण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यांत ५ हजार टन कांदा खरेदीचे उद्दीष्ट आहे. आंतरराज्य व्यापाराला चालना देण्यासाठी वाहतूक आणि साठवणुकीचे अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पणन मंडळाच्या मदतीने व्यापार प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यातील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बाजारात कांद्याची विक्री होईल. तसेच राज्यात २५ हजार टन क्षमतेचे साठवणूक केंद्र उभारले जाईल. त्यामुळे उन्हाळ्यात देखील कांद्याचे दर टिकवता येतील. राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने कांद्याची उत्पादकता घटून उत्पादन कमी होणार आहे. आंध्रप्रदेशातील कांदा आवक कमी होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिना अखेरीस येथील कांदा आवक थांबेल. तर, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील आवक जानेवारी महिना अखेरीस कमी होते. या दरम्यान दक्षिण आणि उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन महाएफपीसीतर्फे करण्यात आले आहे.  

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारPuneपुणे