शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कुटुंबातील मारहाणीमुळे मुले बनतात हिंंसक

By admin | Updated: July 3, 2017 08:47 IST

शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात.

संजय पाठक/ आॅनलाइन लोकमतनाशिक : शिस्त लावण्यासाठी आई-वडील मुलांना मारतात आणि इतकेच नव्हे तर प्रसंगी वस्तू फेकून मारतात किंवा चटकेही देतात... आपण मुलांना शिस्त लावत असतो, असे पालकांचे मत असते आणि ते समाजमान्यही असते. परंतु अशाप्रकारची मारहाणही मुलांवर प्रतिकूल परिणाम करणारी ठरत असून, त्यामुळे मुले हिंसक होतात, असा निष्कर्ष एका पाहणीत निघाला आहे.बालहक्क आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या युनीसेफच्या नाईन इज माईन तसेच मुंबईतील चरखा या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, यवतमाळ, नंदुरबार, जालना, लातूर अशा सात जिल्ह्यांत नुकताच एक सर्व्हे करून मुलांवरील अत्याचार तसेच त्याचा त्यांच्या वर्तनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधन करण्यात आले.

सात जिल्ह्यांत १३ ते १७ वयोगटातील सर्वेक्षणाचा अहवाल या संस्थांनी तयार केला असून, चरखा संस्थेच्या अंजली गाडगीळ यांनी याबाबत माहिती दिली. मुलांना घरात आई-वडील किंवा अन्य मोठ्या व्यक्तींनी मारणे, त्याचप्रमाणे शाळेत शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मारणे यांसह रोजगाराच्या ठिकाणी होणारी मारहाण, हिंंसा, दुर्लक्षित करून केला जाणारा मानसिक छळ तसेच रोजगाराच्या ठिकाणी होणारे आर्थिक शोषण याबाबत संशोधन करण्यात आले.

मुले ऐकत नाही किंवा त्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली पालकांकडून मारहाण केली जाते. त्यातून मुले हिंसक आणि गुन्हेगारीकडे वळतात, असे मुलांच्या चर्चेतून निष्पन्न झाले. या सर्वेक्षणात २५ टक्के मुलांना आई मारहाण करते. २१ टक्के मुलांना वडील मारहाण करतात, असे आढळले आहे. १७ टक्के मुलांना दुसऱ्या मुलांकडून मारहाण झाल्याचे आढळले आहे. २५ टक्के मुलांना चापटीने मारहाण झाली. ६ टक्के मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण होते. तर २ टक्के चटके दिले जातात. मुले शाळेत जाणे टाळतात...शाळांमध्येदेखील मुलांना मारहाण होते. यातील ५९ टक्के मुलांना शारीरिक तसेच मानसिक शोषणाची भीती असते. ५२ टक्के मुलींना दुर्लक्ष करून उपेक्षित ठेवले जाते. ६४ टक्के मुलांना शिक्षणासाठी नाउमेद केले जाते. तर ५२ टक्के मुलांची अन्य मुलांशी तुलना केली जाते. अशा अनेक प्रकारांमुळे मुले शाळेत जाणेच टाळतात. शाळेत शौचालय नाही म्हणून शाळेत जाण्याची मानसिकता नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.लैंगिक अत्याचाराचे बळीकुटुंबात केवळ मारहाणच नव्हे तर लैंगिक अत्याचार होतात. दहा टक्के लैंगिक अत्याचार वडिलांकडून तर ६ टक्के अत्याचार आईकडून होत आहे. याशिवाय कुटुंबातील भाऊ, बहीण, आजी-आजोबा, काका अशा व्यक्तींकडून अत्याचार होत असल्याचे आढळले आहे.मुलांना शिस्तीसाठी मारणे किंवा अन्य अत्याचार केले जातात. त्याकडे माध्यमांपासून सर्वच दुर्लक्ष करतात. केवळ मुलींवर बलात्कार झाला तर तेवढीच दखल माध्यमे घेतात. परंतु कुटुंबातील मारहाण मुलांवर किती परिणामकारक ठरू शकते, हे सर्वेक्षणातून दिसून आले.- अंजली गाडगीळ, चरखा