शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खोटारड्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर २० वर्षांनी खटला चालणार!

By admin | Updated: June 18, 2015 02:35 IST

लक्ष्मण महादेव सारिपुत्र या पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असताना एका

मुंबई : लक्ष्मण महादेव सारिपुत्र या पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असताना एका खटल्यात खोटी साक्ष दिल्याबद्दल व खोटे पुरावे सादर केल्याबद्दल आता त्यांच्यावर सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला चालणार आहे.मालवण पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या त्या खून खटल्यात सावंतवाडी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या खून प्रकरणाचा सारिपुत्र यांनी काही काळ तपासी अधिकारी या नात्याने तपास केला होता. त्या नात्याने खटल्यात त्यांना साक्षीसाठी बोलावले होते. मात्र त्या खटल्याच्या सुनावणीत सारिपुत्र यांनी खोटी साक्ष दिली व बनावट पुरावे सादर केले, असा निष्कर्ष सत्र न्यायालयाने नोंदविला व त्याबद्दल भादंवि कलम १९३ व १९४ अन्वये खटला चालविण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली. याविरुद्ध सारिपुत्र यांनी केलेले अपील उच्च न्यायालयात गेली २० वर्षे प्रलंबित होते व ते दाखल करून घेताना स्थगिती दिली गेल्याने सारिपुत्र यांच्यावरील खटला सुरूही होऊ शकला नव्हता. आता न्या. अभय ठिपसे यांनी अंतिम सुनावणीनंतर सारिपुत्र यांचे अपील फेटाळले. त्यामुळे खोटी साक्ष व खोटे पुरावे देण्याबद्दलचा गेली २० वर्षे अडकून पडलेला खटला आता मार्गी लागेल.न्या. ठिपसे यांनी त्या खटल्यात सारिपुत्र यांनी दिलेली साक्ष पाहिली तेव्हा त्यांना असे आढळले, की त्यांनी खोटी साक्ष व बनावट पुरावे दिल्याची स्पष्ट कबुलीच उलट तपासणीत दिली होती. एवढेच नव्हे, तर इतरही खटल्यांमध्ये पोलीस असेच करतात, अशी बढाईही त्यांनी मारली होती. यासंदर्भात न्या. ठिपसे यांनी असे नमूद केले, की सारिपुत्र यांनी दिलेली कबुली पाहता त्यांच्यावर खटला चालविण्याचा आदेश देण्यावाचून सत्र न्यायालयापुढे पर्यायही नव्हता. तसा आदेश दिला गेला नसता तर ते औचित्याला सोडून ठरले असते आणि त्याने न्यायसंस्था थट्टेचा विषय ठरून तिची अप्रतिष्ठा झाली असती. मुळात चूक कोणाची ? अंतरिम स्थगितीमुळे सारिपुत्र यांच्यावरील खटला २० वर्षे चालू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे न्या. ठिपसे यांनी नमूद केले. पण मुळात खोटी साक्ष व बनावट पुरावे दिल्याची सारिपुत्र यांनीच कबुली दिली आहे, ही वस्तुस्थिती २० वर्षांपूर्वीही तशीच होती. त्यामुळे अपील दाखल करून घेताना पब्लिक प्रॉसिक्युटरने ही बाब लक्षात आणून दिली नाही, म्हणून किंवा न्यायाधीशांच्याही ती लक्षात आली नाही म्हणून स्थगिती दिली. सर्व संबंधितांनी ‘ब्रिफ’ नीटपणे वाचले असते तर मुळात स्थगितीही दिली नसती.चाणाक्ष वकिलाने घेतलेल्या उलट तपासणीत सारिपुत्र गोंधळून गेले व त्यामुळे त्यांनी अशी कबुली दिली, असा त्यांच्या वकिलाने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्या. ठिपसे यांनी म्हटले, की सारिपुत्र यांनी गोंधळून कबुली दिली किंवा कसे हा खटल्यात विचारात घेण्याचा मुद्दा आहे व त्यांना दोषी धरायचे की नाही, हे ठरविताना तो विचारात घेता येईल. पण कबुली दिली होती ही वस्तुस्थिती असल्याने मुळात त्यांच्यावर खटलाही चालवायला नको, असे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे.