शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

काळ्या पैशांपेक्षाही मंदिरांमध्ये प्रचंड काळे धन

By admin | Updated: January 15, 2017 20:43 IST

काळ्या पैशाच्या शोधासाठी केलेल्या नोटाबंदीतून केवळ पाच टक्के हाती लागले. त्यापेक्षाही प्रचंड घबाड

 सदानंद सिरसाट/ ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. 15 -  काळ्या पैशाच्या शोधासाठी केलेल्या नोटाबंदीतून केवळ पाच टक्के हाती लागले. त्यापेक्षाही प्रचंड घबाड देशातील मंदिरांमध्ये सोन्याच्या रूपात दडले आहे. ते शासनजमा करून त्याचा वापर सर्वसामान्यांच्या विकासासाठी करण्याची हिंमत आता केंद्र शासनाने दाखवावी, असे आव्हान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी दिले. अकोल्यातील माथाडी कामगारांच्या मेळाव्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. शेतकरी, कामगारांबद्दल असलेली शासनाची उदासीनता त्यांनी परखडपणे मांडली. 
देशातील काळा पैसा म्हणून केवळ पाच टक्के रक्कम सरकारच्या हाती लागली. त्याचेच ढोल बडवले जात आहेत. देशातील मंदिरांमध्ये मोजदादीच्या पलीकडे सोने आणि संपत्ती आहे. ती शासनजमा करण्याची हिंमत केंद्र शासनाने करावी. नोटाबंदीने शेतकरी, कामगारांच्या चुली पेटण्याच्याही अडचणी झाल्या, त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करण्याचे पापही या शासनाने केल्याचे डॉ. आढाव म्हणाले. 
देशात ‘जय जवान, जय किसान’ म्हटले जाते. प्रत्यक्षात दोघांनाही तेवढेच वंचित ठेवले जाते. जवानाचा सीमेवर मृत्यू झाल्यास शहीद ठरतो, तर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या झाल्यास काय म्हणावे, याचा साधा विचारही केला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 
शेतकरी, कामगारांबाबत शासन कमालीचे उदासीन आहे. शेतकºयांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अंमलबजावणीच्या मागणीसाठी २ आॅक्टोबरपासून पुण्यात उपोषण केले. तिसºया दिवशी पालकमंत्री बापट स्वत: पत्र घेऊन आले. मागण्या मान्य केल्या. त्यासाठी १९ आॅक्टोबर रोजी बैठक घेण्याचे ठरले, अद्यापही बैठकीला बोलावले नाही, त्यातून शासनाची भूमिका स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. 
बेरोजगारांना नोकरी देण्याची ताकद शासनाची नाही. मात्र, त्याचवेळी आरक्षणाची मागणी केली जाते. या परिस्थितीत केवळ आरक्षणातून प्रश्न सुटणारा नाही, हे स्पष्ट असतानाही मोर्चे काढले जातात. त्यामागे आम्ही उपाशी असताना दुसºयाला कसे मिळते, ही भावना असल्याचेही डॉ. आढाव म्हणाले. 
 गांधीच्या चरख्यावर मोदींचा पब्लिसिटी स्टंट
म. गांधीच्या चरख्यासोबत प्रधानमंत्री मोदींनी काढलेले छायाचित्र म्हणजे चिप पब्लिसिटी स्टंट आहे. आज चरख्यासोबत मोदी आहेत, उद्या कदाचित तेथे गांधींची तीन माकडेही ठेवले जातील, असा उपरोधिक टोलाही डॉ. आढाव यांनी लगावला. खादीसाठी फोटो काढताना विदेशी कंपन्यांपुढे लोटांगण घालत कामगारांच्या हिताचे कायदे रद्द करण्याचा अपराध मोदींनी केला. त्यातच बाजार समिती कायदे, माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नाही, त्याचाही विचार करण्याचे म्हटले.