शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मराठा आरक्षणाबाबत आदेशाअभावी गोंधळ !

By admin | Updated: February 19, 2015 02:55 IST

मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण वगळून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी तसा आदेश अद्याप न निघाल्याने एकूण भरती प्रक्रियाच रखडली आहे.

आदेशाअभावी भरतीच रखडली : १६ टक्के जागांबाबत साशंकतामुंबई : मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण वगळून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी तसा आदेश अद्याप न निघाल्याने एकूण भरती प्रक्रियाच रखडली आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने १६ टक्के जागा रिक्त ठेवता येईल की नाही, याबाबतही सरकारी पातळीवर गोंधळच आहे.९ जुलै २०१४ ते १४ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत झालेल्या शासकीय नोकऱ्यांमधील भरतीतील मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय १० फेब्रुवारीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र त्या संबंधीचा लेखी आदेश अद्याप निघालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शासनाने राज्याचे महाअधिवक्ते सुनील मनोहर यांचा सल्ला घेतला. मराठा आरक्षणाचा अध्यादेश ९ जुलै २०१४ रोजी काढण्यात आला होता. त्याला उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली. या काळातील भरतीत आरक्षणाचा लाभ देता येईल, पण नंतरच्या भरतीत न्यायालयीन स्थगितीमुळे मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य होईल का, यावर कायदेशीर बाब तपासली जात आहे. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाचा स्थगनादेश असूनही १६ टक्के वगळून इतर पदांची भरती केल्यास ते न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरू शकते. भविष्यात न्यायालय आरक्षणाबाबतची स्थगिती उठविणार, असे गृहीत धरून सरकारने निर्णय घेतला अशी न्यायालयाची भावना होऊ शकते, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. लेखी आदेश न निघाल्याने शासनाच्या हजारो पदांची भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे. महावितरणमधील साडेसहा हजार पदांची भरती प्रक्रिया शासनाच्या सुस्पष्ट आदेशाअभावी पूर्ण होऊ शकलेली नाही.