शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

मराठा आरक्षणाबाबत आदेशाअभावी गोंधळ !

By admin | Updated: February 19, 2015 02:55 IST

मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण वगळून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी तसा आदेश अद्याप न निघाल्याने एकूण भरती प्रक्रियाच रखडली आहे.

आदेशाअभावी भरतीच रखडली : १६ टक्के जागांबाबत साशंकतामुंबई : मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण वगळून उर्वरित जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी तसा आदेश अद्याप न निघाल्याने एकूण भरती प्रक्रियाच रखडली आहे. शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने १६ टक्के जागा रिक्त ठेवता येईल की नाही, याबाबतही सरकारी पातळीवर गोंधळच आहे.९ जुलै २०१४ ते १४ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत झालेल्या शासकीय नोकऱ्यांमधील भरतीतील मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय १० फेब्रुवारीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र त्या संबंधीचा लेखी आदेश अद्याप निघालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर शासनाने राज्याचे महाअधिवक्ते सुनील मनोहर यांचा सल्ला घेतला. मराठा आरक्षणाचा अध्यादेश ९ जुलै २०१४ रोजी काढण्यात आला होता. त्याला उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली. या काळातील भरतीत आरक्षणाचा लाभ देता येईल, पण नंतरच्या भरतीत न्यायालयीन स्थगितीमुळे मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य होईल का, यावर कायदेशीर बाब तपासली जात आहे. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाचा स्थगनादेश असूनही १६ टक्के वगळून इतर पदांची भरती केल्यास ते न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरू शकते. भविष्यात न्यायालय आरक्षणाबाबतची स्थगिती उठविणार, असे गृहीत धरून सरकारने निर्णय घेतला अशी न्यायालयाची भावना होऊ शकते, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. लेखी आदेश न निघाल्याने शासनाच्या हजारो पदांची भरती प्रक्रिया ठप्प झाली आहे. महावितरणमधील साडेसहा हजार पदांची भरती प्रक्रिया शासनाच्या सुस्पष्ट आदेशाअभावी पूर्ण होऊ शकलेली नाही.