शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नकारात्मक प्रसिद्धीची फडणवीस सरकारला धास्ती, बातमी येताच तत्काळ खुलासा करण्याचे आदेश

By यदू जोशी | Updated: September 16, 2017 04:46 IST

 मुंबई : प्रसारमाध्यमांमधून सरकारबद्दल येणा-या नकारात्मक बातम्यांचे स्पष्टीकरण ताबडतोब करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तसे पत्र मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सर्व विभागांना पाठविले आहे. तत्काळ खुलासा केला नाही तर ती अनियमितता समजण्यात येईल, असे या पत्रात बजावण्यात आले आहे.येत्या ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण करीत असलेले ...

 मुंबई : प्रसारमाध्यमांमधून सरकारबद्दल येणा-या नकारात्मक बातम्यांचे स्पष्टीकरण ताबडतोब करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तसे पत्र मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सर्व विभागांना पाठविले आहे. तत्काळ खुलासा केला नाही तर ती अनियमितता समजण्यात येईल, असे या पत्रात बजावण्यात आले आहे.येत्या ३१ आॅक्टोबरला तीन वर्षे पूर्ण करीत असलेले फडणवीस सरकार तीन वर्षांतील उपलब्धींची सकारात्मक प्रसिद्धी करण्याची जोरदार तयारी करीत आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी होत असताना गैरसमजावर आधारित एखाद्या बातमीमुळे जनमानसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यास विभागांना सांगण्यात आले आहे. एखाद्या विभागाविषयी नकारात्मक बातमी आलेली असेल तर ती संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाºयांवर टाकण्यात आली आहे. खुलासा टपालाद्वारे पाठवू नका. ई-मेलनेच पाठवा, असेही बजावण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे बाकी असताना देवेंद्र फडणवीस सरकार हे प्रसिद्धीबाबत अधिक सजग व संवेदनशील झाले आहे. सरकारवरील प्रत्येक टीका, आरोपांचा इन्कार खुलाशांद्वारे करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात खुलाशांबाबत असा दबाव कधीही नव्हता, असा अनुभव एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितला.अधिकारी धास्तावलेलेप्रसिद्धी माध्यमांना तत्काळ खुलासा पाठवा, तो मिळाला की नाही याची खात्री करा, त्याला प्रसिद्धी मिळेल यासाठी पाठपुरावा करा, असे आदेश माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकाºयांना देण्यात आले आहेत.त्यामुळे सध्या ते सगळे ‘खुलासा अधिकारी’ बनले आहेत. ‘आली बातमी की कर खुलाशाची सोय’ अशी आमची अवस्था असल्याचे एक अधिकारी म्हणाले.फक्त मीच बोलणार...फडणवीस सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने आपल्या विभागात स्पष्टच बजावले आहे की त्यांच्याशिवाय प्रसिद्धी माध्यमांशी कोणीही बोलणार नाही. त्यांच्या विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे आणि एखाद्या विषयावरील सरकारची भूमिका आणि ज्येष्ठ अधिकाºयांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेली माहिती यात बरेचदा विसंगती आढळते.एका बातमीबाबत या विभागाच्या मंत्रालयात बसणा-या सचिवांना विचारले असता, ‘मंत्रिमहोदयांशिवाय कोणीही बोलणार नाही असे आम्हाला आदेश आहेत. त्यामुळे मी बोलू शकत नाही,’ असे हे सचिव म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस