शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 14:13 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर राज्यभर दौरा करण्याची योजना असून बुथ पातळीपर्यंतच जाळं आणखी मजबूत करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होते. २०१९ मध्ये देखील मोदींच्या अवतीभवतीच निवडणूक पार पडली. याचा भाजपला फायदाच झाला. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळं चित्र नाही. आगामी विधानसभा निवडणूक देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवतीच फिरणार असं दिसत आहे.

मागील पाच वर्षांत फडणवीस यांच्या मुत्सदी राजकारणामुळे भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सांगणारा एकही नेता समोर आलेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षातून बेदखल झाले आहे. त्यामुळे राज्यात फडणवीसच भाजपचा चेहरा असतील, अशी शक्यता आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर राज्यात झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छूकांची यादी भली मोठी होती. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठतेच्या मुद्दावर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार तर महिला चेहरा पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत होती. किंबहुना पंकजा मुंडे, खडसे यांनी तर आपली महत्त्वाकांक्षा अनेकदा बोलून दाखवली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदाची माळ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडली. नागपूरचे असल्यामुळे आणि संघाचं असलेला पाठबळ फडणवीस यांच्या पारड्यात पडल्याने हे शक्य झालं होतं.

सत्तेच्या ५ वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच जाळं मोठ्या प्रमाणात वाढला. एवढच काय तर त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेला देखील जेरीस आणलं. मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेला या विधानसभा निवडणुकीत बरोबरीत आणण्याची किमया फडणवीस यांनी करून दाखवली. अर्थात त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळवून दिले. यात त्यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची साथही लाभली.

दरम्यानच्या काळात भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी अनेकांना क्लीनचीट दिली. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी वेळोवेळी दावा ठोकणाऱ्या खडसेंचा बचाव करण्यात फडणवीस अपयशी ठरले. तर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे देखील कोणत्या ना कोणत्या वादात अडकले. पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. तर तावडे यांच्या बनावट डिग्री प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. ही प्रकरण मिटल्यानंतर या नेत्यांकडून कधीही मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सहाजिकच फडणवीस यांचे मैदान मोकळे झाले.

फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आणि चंद्रकात पाटील यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, या चर्चांना सबळ पाठबळ मिळालेच नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी सबकुछ फडणवीस असंच समिकरण ठरलं आहे.