शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 14:13 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर राज्यभर दौरा करण्याची योजना असून बुथ पातळीपर्यंतच जाळं आणखी मजबूत करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होते. २०१९ मध्ये देखील मोदींच्या अवतीभवतीच निवडणूक पार पडली. याचा भाजपला फायदाच झाला. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळं चित्र नाही. आगामी विधानसभा निवडणूक देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवतीच फिरणार असं दिसत आहे.

मागील पाच वर्षांत फडणवीस यांच्या मुत्सदी राजकारणामुळे भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सांगणारा एकही नेता समोर आलेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षातून बेदखल झाले आहे. त्यामुळे राज्यात फडणवीसच भाजपचा चेहरा असतील, अशी शक्यता आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर राज्यात झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छूकांची यादी भली मोठी होती. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठतेच्या मुद्दावर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार तर महिला चेहरा पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत होती. किंबहुना पंकजा मुंडे, खडसे यांनी तर आपली महत्त्वाकांक्षा अनेकदा बोलून दाखवली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदाची माळ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडली. नागपूरचे असल्यामुळे आणि संघाचं असलेला पाठबळ फडणवीस यांच्या पारड्यात पडल्याने हे शक्य झालं होतं.

सत्तेच्या ५ वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच जाळं मोठ्या प्रमाणात वाढला. एवढच काय तर त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेला देखील जेरीस आणलं. मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेला या विधानसभा निवडणुकीत बरोबरीत आणण्याची किमया फडणवीस यांनी करून दाखवली. अर्थात त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळवून दिले. यात त्यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची साथही लाभली.

दरम्यानच्या काळात भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी अनेकांना क्लीनचीट दिली. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी वेळोवेळी दावा ठोकणाऱ्या खडसेंचा बचाव करण्यात फडणवीस अपयशी ठरले. तर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे देखील कोणत्या ना कोणत्या वादात अडकले. पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. तर तावडे यांच्या बनावट डिग्री प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. ही प्रकरण मिटल्यानंतर या नेत्यांकडून कधीही मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सहाजिकच फडणवीस यांचे मैदान मोकळे झाले.

फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आणि चंद्रकात पाटील यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, या चर्चांना सबळ पाठबळ मिळालेच नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी सबकुछ फडणवीस असंच समिकरण ठरलं आहे.