शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘दिव्यांग’ विद्यार्थ्यांना पहिलीपासून सुविधा

By admin | Updated: January 9, 2016 02:57 IST

यापुढे पहिली ते नववीपर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना (दिव्यांग) सामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता येणार आहे.

शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केवळ दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती ही सवलत मर्यादित न राहता यापुढे १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार यापुढे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना-व्यक्तींना ‘दिव्यांग’ असे संबोधण्याचा राज्य शासन निर्णय घेतल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केला असून, तो महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, अशी माहितीही तावडे यांनी दिली.तावडे म्हणाले, १९७८पासून अपंग (दिव्यांग) एकात्म शिक्षण सुरू करण्यात आले. २००९पर्यंत या योजनेअंतर्गत विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, १ एप्रिल २०१० रोजी बाल शिक्षण हक्क कायदा, २००९ अस्तित्वात आला. २००९पासून अपंग एकात्म शिक्षण योजनेचे रूपांतरण समावेशित शिक्षण योजनेत करण्यात आले आहे.विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना (दिव्यांग) सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर नियमित शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा समावेशित शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्यतेची गरज लागते. त्यांना शैक्षणिक प्रगतीस पूरक ठरणाऱ्या आवश्यक भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधांची पूर्तता करण्याचा विचार करून राज्य शासनाने हा शासन निर्णय घेतल्याचे तावडे म्हणाले.