शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
3
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
4
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
5
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
6
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
7
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
8
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
9
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
10
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
11
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
12
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
13
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
14
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
15
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
16
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
18
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
19
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
20
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:23 IST

ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे.

लोकसभेत महायुतीला दणका दिल्यानंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. मविआतील तिन्ही पक्ष ९० ते ९५ जागा लढविण्याची शक्यता आहे. परंतू या जागा कोणत्या असतील यावर ओढाताण होण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. यापैकी महत्वाचा असलेला मुंबई भाग शिवसेनाला हवा आहे. 

दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबईतील बहुतांश जागा ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्याची साधक बाधक चर्चा झाल्याचे समजते आहे. विधानसभेच्या ज्या जागांवर जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस यात नसल्याने व मुंबईत एकतर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व असल्याने आता ठाकरे मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी काँग्रेसला किती जागा सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी २५ ते २८ जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते आहे. भाजपसोबत मैत्री असताना ठाकरे शिवसेनेने गेल्यावेळी १४ जागा जिंकल्या होत्या. यापैकी आठ आमदार आता ठाकरेंसोबत तर सहा आमदार शिंदेंसोबत आहेत. यापैकी एक आमदार आता खासदार झाले आहेत. यामुळे दोन्ही गटाकडून या जागांवर नव्या उमेदवारांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

२०१९ मध्ये काँग्रेसचे चार आमदार आले होते. त्यापैकी वर्षा गायकवाड आता खासदार आहेत. तर राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आला होता. हा आमदार आता महायुतीसोबत आहे. यामुळे इथेही काही प्रमाणात तडजोड होण्याची शक्यता आहे. लोकसभेचे यश पाहता ठाकरे गट महापालिका निवडणुकीची बालेकिल्ल्यातील तयारी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीशी उर्वरित राज्यातील जागांवर तडजोड करून मुंबईत जादाच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी