शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तुंबण्यावर उतारा ‘होल्डिंग’चा

By admin | Updated: August 5, 2016 02:07 IST

मुसळधार पावसाने आणि त्याच वेळेस आलेल्या खाडीच्या भरतीमुळे शहरातील सुमारे २८ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

ठाणे : रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्याच वेळेस आलेल्या खाडीच्या भरतीमुळे शहरातील सुमारे २८ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, म्हणून पालिकेने आता खाडीकिनाऱ्याच्या महत्त्वाच्या स्पॉटवर होल्डिंग पॉण्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या होल्डिंग पॉण्डमध्ये शहरात झालेल्या पावसाचे पाणी जमा होणार आहे. ओहोटी आल्यानंतर हे साचलेले पाणी खाडीत सोडले जाणार आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटनांना आळा बसेल, असा दावा पालिकेने केला आहे.रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे बिंग उघड केले असून घोडबंदरसह शहरातील अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना समोर आल्या. घोडबंदर भागात तर अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळे अनेक भागांत पाणी साचले होते. परंतु, एमएसआरडीसीच्या चुकीमुळेच हे पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला होता. एमएसआरडीसीने याचे खापर पालिकेवर फोडले होते. परंतु, आता यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा, म्हणून एमएसआरडीसीला समज देण्यात आली असली तरी यापुढेही जाऊन आता नेदरलॅण्डच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात अधिक पाणी साचणाऱ्या भागांचा सर्व्हे केला जाणार असून पाणी साचण्याची नेमकी कारणे काय आहेत, याचा मागोवा घेतला जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात साधारणपणे १० होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. दरम्यान, अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने राबवली असून त्यांनी डच अ‍ॅण्ड पॉण्ट मेथड म्हणजेच फ्लॅट गेटचा आधार घेत भरतीच्या वेळेस खाडीत शहरातील पाणी सोडणे रोखून धरले. हे प्लांट त्यांनी वाशी आणि सीबीडीमध्ये उभारले आहे. त्यामुळे या भागात सध्या पाणी तुंबण्याच्या घटनांना आळा बसला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून आता ठाणे महापालिकेनेदेखील अशा प्रकारे डच अ‍ॅण्ड पॉण्ट ही मेथड वापरून होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व्हे केला जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)>ओहोटी सुरू झाल्यावर पाणी सोडणारपावसाळ्यात जोरदार पाऊस असताना त्याच वेळेस भरतीला उधाण आले असेल तर भरतीचे पाणी हे शहरात शिरते, किंबहुना पावसाचे पाणी हे खाडीत जाण्याचा प्रयत्न करते. परंतु, पाण्याचा फ्लो अधिक असल्याने ते पाणी शहराच्या विविध भागांत साचले जाते. त्यामुळे आता पाणी साचण्याच्या अशा ठिकाणांवर हे होल्डिंग पॉण्ट उभारले जाणार असून त्या ठिकाणी शहरातील येणारे पाणी साचवले जाणार आहे. त्यानंतर, खाडीचे उधाण कमी झाल्यानंतर किंबहुना ओहोटी सुरू झाल्यानंतर हे पाणी खाडीत सोडले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.