शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

तुंबण्यावर उतारा ‘होल्डिंग’चा

By admin | Updated: August 5, 2016 02:07 IST

मुसळधार पावसाने आणि त्याच वेळेस आलेल्या खाडीच्या भरतीमुळे शहरातील सुमारे २८ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

ठाणे : रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि त्याच वेळेस आलेल्या खाडीच्या भरतीमुळे शहरातील सुमारे २८ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, म्हणून पालिकेने आता खाडीकिनाऱ्याच्या महत्त्वाच्या स्पॉटवर होल्डिंग पॉण्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या होल्डिंग पॉण्डमध्ये शहरात झालेल्या पावसाचे पाणी जमा होणार आहे. ओहोटी आल्यानंतर हे साचलेले पाणी खाडीत सोडले जाणार आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटनांना आळा बसेल, असा दावा पालिकेने केला आहे.रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे बिंग उघड केले असून घोडबंदरसह शहरातील अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना समोर आल्या. घोडबंदर भागात तर अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळे अनेक भागांत पाणी साचले होते. परंतु, एमएसआरडीसीच्या चुकीमुळेच हे पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला होता. एमएसआरडीसीने याचे खापर पालिकेवर फोडले होते. परंतु, आता यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा, म्हणून एमएसआरडीसीला समज देण्यात आली असली तरी यापुढेही जाऊन आता नेदरलॅण्डच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.शहरात अधिक पाणी साचणाऱ्या भागांचा सर्व्हे केला जाणार असून पाणी साचण्याची नेमकी कारणे काय आहेत, याचा मागोवा घेतला जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात साधारणपणे १० होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. दरम्यान, अशा प्रकारची प्रक्रिया यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने राबवली असून त्यांनी डच अ‍ॅण्ड पॉण्ट मेथड म्हणजेच फ्लॅट गेटचा आधार घेत भरतीच्या वेळेस खाडीत शहरातील पाणी सोडणे रोखून धरले. हे प्लांट त्यांनी वाशी आणि सीबीडीमध्ये उभारले आहे. त्यामुळे या भागात सध्या पाणी तुंबण्याच्या घटनांना आळा बसला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून आता ठाणे महापालिकेनेदेखील अशा प्रकारे डच अ‍ॅण्ड पॉण्ट ही मेथड वापरून होल्डिंग पॉण्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्व्हे केला जाणार असून येत्या काही काळात या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)>ओहोटी सुरू झाल्यावर पाणी सोडणारपावसाळ्यात जोरदार पाऊस असताना त्याच वेळेस भरतीला उधाण आले असेल तर भरतीचे पाणी हे शहरात शिरते, किंबहुना पावसाचे पाणी हे खाडीत जाण्याचा प्रयत्न करते. परंतु, पाण्याचा फ्लो अधिक असल्याने ते पाणी शहराच्या विविध भागांत साचले जाते. त्यामुळे आता पाणी साचण्याच्या अशा ठिकाणांवर हे होल्डिंग पॉण्ट उभारले जाणार असून त्या ठिकाणी शहरातील येणारे पाणी साचवले जाणार आहे. त्यानंतर, खाडीचे उधाण कमी झाल्यानंतर किंबहुना ओहोटी सुरू झाल्यानंतर हे पाणी खाडीत सोडले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.