शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ! उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:40 IST

सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने

मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने, आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.मुंबई विद्यापीठाने शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखेत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वाचे काही निकाल जाहीर केले, पण या निकालातही मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला आहे. आतापर्यंत तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे समोर आले आहे.पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवी अभ्यासक्रमाचे गुण अनिवार्य आहेत, पण सप्टेंबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचे गुण समजलेले नाहीत. संकेतस्थळावर आता विद्यार्थ्यांना निकाल समजणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, पण तरीही अनेक विद्यार्थ्यांना निकाल दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, या सर्व गोंधळानंतर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने, विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास -मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सुरू असलेला गोंधळ अजूनही संपलेला नाही. विद्यापीठाने आतापर्यंत ४००हून अधिक निकाल जाहीर केले असले तरी तरी त्यातही अनेक विद्यार्थी नापास आहेत. काहींना शून्य गुण देण्यात आला आहे. पण, याचे खरे कारण म्हणजे या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे समोर येत आहे.मुंबई विद्यापीठ यंदा १६०वे वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे विद्यापीठाने काही नवीन उपक्रम सुरू केले. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला डिजिटल करण्यासाठी तसेच निकाल जलद लावण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात केली. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असतानाच यंदापासून उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होईल अशी घोषणा केली. आॅनलाइन तपासणीमुळे लवकर निकाल लागतील असा विश्वास कुलगुरूंना होता.प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्यातही मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. अनेक हुशार विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाला आहे. तर, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे चौकशी केल्यास उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे सांगितले जाते. स्कॅनिंग प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतरत्र गेल्याची भीती आहे. यावर आता विद्यापीठ काय तोडगा काढणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठStudentविद्यार्थी