शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ! उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:40 IST

सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने

मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने, आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.मुंबई विद्यापीठाने शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखेत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वाचे काही निकाल जाहीर केले, पण या निकालातही मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला आहे. आतापर्यंत तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे समोर आले आहे.पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवी अभ्यासक्रमाचे गुण अनिवार्य आहेत, पण सप्टेंबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचे गुण समजलेले नाहीत. संकेतस्थळावर आता विद्यार्थ्यांना निकाल समजणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, पण तरीही अनेक विद्यार्थ्यांना निकाल दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, या सर्व गोंधळानंतर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने, विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास -मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सुरू असलेला गोंधळ अजूनही संपलेला नाही. विद्यापीठाने आतापर्यंत ४००हून अधिक निकाल जाहीर केले असले तरी तरी त्यातही अनेक विद्यार्थी नापास आहेत. काहींना शून्य गुण देण्यात आला आहे. पण, याचे खरे कारण म्हणजे या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे समोर येत आहे.मुंबई विद्यापीठ यंदा १६०वे वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे विद्यापीठाने काही नवीन उपक्रम सुरू केले. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला डिजिटल करण्यासाठी तसेच निकाल जलद लावण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात केली. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असतानाच यंदापासून उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होईल अशी घोषणा केली. आॅनलाइन तपासणीमुळे लवकर निकाल लागतील असा विश्वास कुलगुरूंना होता.प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्यातही मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. अनेक हुशार विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाला आहे. तर, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे चौकशी केल्यास उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे सांगितले जाते. स्कॅनिंग प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतरत्र गेल्याची भीती आहे. यावर आता विद्यापीठ काय तोडगा काढणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठStudentविद्यार्थी