शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:33 IST

या नियमांमुळे राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उद्योगांचे नियमितपणे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या एक खिडकी प्रणालीद्वारे अर्ज करून मिळवता येणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून, अर्जदारास खेटे मारण्याची गरज भासणार नाही.

मुंबई : उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुलभतेसाठी नवे नियम आता करण्यात आले असून त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या मिळण्यात सुलभता येणार आहे. या संबंधीचे धोरण ५ ऑगस्टपासून राज्यात लागू झाले आहे.

या नियमांमुळे राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान उद्योगांचे नियमितपणे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या एक खिडकी प्रणालीद्वारे अर्ज करून मिळवता येणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार असून, अर्जदारास खेटे मारण्याची गरज भासणार नाही.

नियमांनुसार, अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाने ठराविक कालमर्यादेत निर्णय घेणे बंधनकारक केले आहे. विलंब झाल्यास, प्रकरण अधिकारप्रदत्त समितीकडे वर्ग केले जाईल, जी १५ ते ४५ दिवसांच्या आत निर्णय घेईल. याशिवाय पर्यवेक्षण समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे, जी धोरणांवर देखरेख ठेवेल आणि अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली जाते यावर लक्ष देईल. पारदर्शकता, कार्यक्षमतेची वाढ आणि प्रशासनिक सुलभीकरण यावर भर देण्यात आला आहे.

अर्ज करा ऑनलाइनअर्ज प्रक्रिया : उद्योग किंवा गुंतवणूक प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांसाठी एक खिडकी प्रणालीद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइनही करता येईल. सक्षम प्राधिकारी अर्ज तपासेल व आवश्यक असल्यास माहिती मागवेल. जर अर्ज नाकारला, तर कारणे संगणकीय प्रणालीवर अपलोड केली जातील.

लघु, मध्यम क्षेत्राला लाभऔद्योगिक धोरणांच्या कालावधीत अर्ज केलेल्या, मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावांना आता कालबद्ध मंजुरी मिळणार आहे. विशेषतः लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला या निर्णयाचा मोठा लाभ होऊन औद्योगिक विस्ताराला चालना मिळेल.

समिती ठेवणार लक्ष, जबाबदारी निश्चित करणारसक्षम प्राधिकारी वेळेत निर्णय घेऊ शकला नाही, तर अर्ज अधिकारप्रदत्त समितीकडे जाईल.

विकास आयुक्त (उद्योग) हे या समितीचे अध्यक्ष असतील. समिती किमान १५ दिवसांतून एकदा बैठक घेईल.

अर्जांवर निर्णय घेण्यासाठी समिती बैठक आयोजित करेल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागाचीही मुभा असेल.

गुंतवणूक सुलभ करण्यासाठी सरकारला शिफारशी करण्याचे कामही ही समिती करेल.

पर्यवेक्षकीय समितीचे अध्यक्ष राज्याचे उद्योग सचिव असतील. या समितीची बैठक तीन महिन्यांतून एकदा होईल. ही समिती अधिकारप्रदत्त समितीच्या कामावर देखरेख ठेवेल, मार्गदर्शन करेल.

कालमर्यादेत विविध परवानग्या मिळाल्याच पाहिजेत यासाठीची जबाबदारी निश्चित करणे हे पर्यवेक्षकीय समितीचे काम असेल. तसेच गुंतवणुकीचे दीर्घकालीन धोरणे निश्चित करण्याचे कामही समिती करेल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक