शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मुदत संपली; आरक्षणानुसार दिलेल्या बढत्या संपुष्टात!

By यदू जोशी | Updated: October 29, 2017 06:00 IST

उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयास दिलेल्या तहकुबीची मुदत उलटून गेल्यावरही राज्य सरकारने या निर्णयास सुप्रीम कोर्टातून स्थगिती न मिळविल्याने २००४ पासून आरक्षणाच्या आधारे दिलेल्या सर्व बढत्या रद्द झाल्या आहेत.

मुंबई : उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयास दिलेल्या तहकुबीची मुदत उलटून गेल्यावरही राज्य सरकारने या निर्णयास सुप्रीम कोर्टातून स्थगिती न मिळविल्याने २००४ पासून आरक्षणाच्या आधारे दिलेल्या सर्व बढत्या रद्द झाल्या आहेत.बढत्यांसाठीचा राज्य सरकारने २५ मे २००४ रोजी काढलेला जीआर हायकोर्टाने ४ आॅगस्ट २०१७ रोजी घटनाबाह्य ठरवला व त्याबाबत १२ आठवड्यांत कारवाई करावी, असा आदेश दिला. याविरुद्ध राज्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निकालास १२ आठवडे स्थगिती दिली. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा २८ मार्च २००८ चा अंतरिम आदेश लागू राहील, असे स्पष्ट केले.त्यानुसार, राज्याने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली. त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार असली तरी १२ आठवड्यांची मुदत २७ आॅक्टोबरलाच संपल्याने अंतरिम आदेशानुसार सुरू राहिलेले बढत्यांमधील आरक्षण संपुष्टात आले. उच्च न्यायालयाने ९ मार्च २००७ च्या अंतरिम आदेशात भटके विमुक्त व विशेष मागासवर्गीयांच्या १३ टक्के बढतीत आरक्षण ठेवण्यास अनुमती दिली होती आणि एससी, एसटीच्या बढत्यांना स्थगिती कायम ठेवली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने सर्व मागास प्रवर्गांच्या बढत्या आरक्षणानुसार देण्यास २८ मार्च २००८ च्या अंतरिम आदेशानुसार संमती दिली. ती उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढेपर्यंतच होती. सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशानुसार राज्यात बढत्यांमधील आरक्षण कायम होते. या नव्या बढत्यांचे भवितव्यही आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल.

टॅग्स :Courtन्यायालय