शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

'महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य', मंत्रिमंडळ विस्तारावर शालिनी ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:01 IST

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रिपद देण्यात आले नाही, त्यावरुन सरकारवर टीका होत आहे.

मुंबई: नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, दोन्ही पक्षात अनेक महिला आमदार आहेत, पण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. यावरुन मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

मंगळवारी पार पडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात दोन्ही पक्षातील प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यात महिलानांना स्थान न देण्यावरुन विरोधकांकडून टीका होत आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन सरकारवर शरसंधान साधले. 

त्या म्हणाल्या, '2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 288 आमदारांपैकी 24 महिला आमदार आहेत. त्यातल्या 12 महिला आमदार भाजपच्या आहेत, तरीही भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रीपद द्यावंसं वाटलं नाही! खरंच, आपले सत्ताधारी, आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था इतकी महिलाविरोधी #AntiWomen का आहे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या पुढे म्हणतात की, 'महाराष्ट्रात शिवसेना बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही. यावर अनेकांनी टीका केली की, राज्य सरकार महिलांना 'दुय्यम' वागणूक देत आहे. पण ही दुय्यम वागणूक नव्हे! राज्यातल्या 5 कोटी मुली, महिला यांचं अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे. For MahaGovt, women doesn't exist,' अशी संतत्प प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस