शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

'महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य', मंत्रिमंडळ विस्तारावर शालिनी ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:01 IST

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाही महिलेला मंत्रिपद देण्यात आले नाही, त्यावरुन सरकारवर टीका होत आहे.

मुंबई: नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, दोन्ही पक्षात अनेक महिला आमदार आहेत, पण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नाही. यावरुन मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

मंगळवारी पार पडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात दोन्ही पक्षातील प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यात महिलानांना स्थान न देण्यावरुन विरोधकांकडून टीका होत आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन सरकारवर शरसंधान साधले. 

त्या म्हणाल्या, '2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 288 आमदारांपैकी 24 महिला आमदार आहेत. त्यातल्या 12 महिला आमदार भाजपच्या आहेत, तरीही भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रीपद द्यावंसं वाटलं नाही! खरंच, आपले सत्ताधारी, आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था इतकी महिलाविरोधी #AntiWomen का आहे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्या पुढे म्हणतात की, 'महाराष्ट्रात शिवसेना बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही. यावर अनेकांनी टीका केली की, राज्य सरकार महिलांना 'दुय्यम' वागणूक देत आहे. पण ही दुय्यम वागणूक नव्हे! राज्यातल्या 5 कोटी मुली, महिला यांचं अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे. For MahaGovt, women doesn't exist,' अशी संतत्प प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस