शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

अतिवृष्टीने पिके नेस्तनाबूत तर शेतकरी हवालदिल; आतापर्यंत ५ जणांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 07:34 IST

५ शेतकऱ्यांची आत्महत्या, मराठवाड्यात तीन : विदर्भातील दोघांचा समावेश

मुंबई : नापिकी व अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कपाशी आदी नगदी पिके नेस्तनाबूत झाल्याने तसेच नापिकीमुळे विदर्भात दोघा तरुण शेतकऱ्यांनी तर मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.धामणगावात दोघांनी संपविले जीवनधामणगाव रेल्वे (अमरावती) : दोन वर्षांपासून नापिकीचा सामना केल्यानंतर यंदा हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पिक अतिवृष्टीने नेस्तनाबूत झाल्याने आलेल्या निराशेपोटी दोन युवा शेतकºयांनी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव निस्ताने व उसळगव्हाण येथे घडली. प्रीतम भास्करराव ठाकरे (३०, रा. बोरगाव निस्ताने) व दीपक प्रमोद डफळे (२५, उसळगव्हाण), अशी मृतांची नावे आहेत. ठाकरे यांच्या शेतात पाणी साचल्याने कपाशी पीक पिवळे पडले. शेतीकर्ज कसे फे डायचे, या विवंचनेत त्यांनी घरी गळफास घेतला. तर डफळे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रेचा अंत केला.लातुरात दोघांनी केला अंतवाढवणा बु़ (जि़ लातूर) : निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील परमेश्वर नागनाथ बिरादार (वय ३४) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अतिवृष्टीने सोयाबीन खराब झाल्याने नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. तर सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त झालेल्या ६८ वर्षीय शेतकºयाने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपिनाथ ग्यानोबा मद्देवाड (रा़ वाढवणा खु़, ता़ उदगीर) असे त्यांचे नाव आहे़हिंगोलीत तरुणाने घेतले विषसेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील लिंबाळा तांडा येथील ३२ वर्षीय तरूणाने अतिवृष्टीच्या नैराश्यातून आत्महत्या केली. विजय बन्सी आडे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. विजय आडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. या नैराश्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी विष प्राशन केले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Rainपाऊस