शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

दर साडेदहा मिनिटांना देशात एकास सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:15 IST

राज्यात सर्वाधिक प्रमाण; आरोग्य व्यवस्थापन प्रणालीचा अहवाल

मुंबई : देशात सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर महिन्यांत राज्यात ३३ हजार ६७३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. तर देशात १ लाख ६१ हजार ४७८ सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४-१५ साली ३८ हजार ५१४, २०१५-१६ साली ३९ हजार १०३, २०१६-१७ साली ३६ हजार ६० सर्पदंशाच्या घटना घडल्या. देशात दर साडेदहा मिनिटाला एका व्यक्तीला सर्पदंश होतो, असे भारत सरकारच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशीगंधा नाईक यांनी या संदर्भात सांगितले की, देशात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र, त्यावर तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो. देशात एड्स आजाराने सर्वांत जास्त बळी जातात. त्यानंतर, सर्पदंश होऊन बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सरकार एड्सवर उपाययोजना, जागृती करते. मात्र, सर्पदंशाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती जास्त प्रमाणात होताना दिसून येत नाही. सर्पदंशाच्या घटनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू