शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कर्मचा-यांवर काही प्रमाणात अन्याय झाला तरी समाजाला वेठीस धरून ते संप पुकारू शकत नाहीत- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 23:32 IST

सलग चौथ्या दिवशी संप पुकारून सामान्यांना वेठीस धरणा-या एसटीच्या कर्मचा-यांना उच्च न्यायालयानं संप तात्काळ मागे घेण्याचा शुक्रवारी आदेश दिला.

- दीप्ती देशमुखमुंबई- सलग चौथ्या दिवशी संप पुकारून सामान्यांना वेठीस धरणा-या एसटीच्या कर्मचा-यांना उच्च न्यायालयानं संप तात्काळ मागे घेण्याचा शुक्रवारी आदेश दिला. या संपामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, वृद्ध, रुग्ण, लहान मुले, प्रवासी व अपंगांचे हाल झाले आहेत, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं हा संप सकृतदर्शनी बेकायदा ठरवला आहे. 

शुक्रवारच्या सुनावणीत राज्य सरकारनं न्यायालयात सांगितले की, संघटना व सरकारमध्ये अनेक वेळा चर्चा झाली असून, अद्याप तडजोड झालेली नाही. मात्र हा संप मिटवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संघटनेने त्यांच्या तक्रारी उच्चस्तरीय समितीपुढे मांडाव्यात, त्यानंतर ही समिती दोन महिन्यांत वेतन वाढीबाबत निर्णय घेईल. मात्र यासाठी संघटनांनी तात्काळ संप मागे घ्यावे, असं सरकारनं न्यायालयाला सांगितले. मात्र संघटनांनी या प्रस्तावाला नकार दिला. संघटनेचे अधिकारी समिती नेमण्याच्या या निर्णयाशी सहमत नाहीत, अशी माहिती संघटनेच्या वकिलांनी न्यायालयात दिली. 

या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्रीच असावेत, तसेच वेतनामध्ये अंतरिम वाढ म्हणून किमान 8 हजार रुपये वाढ देण्यात यावी, तरच संप मागे घेऊ, अशी भूमिकाही एसटी कर्मचारी संघटनांनी मांडली आहे. कर्मचा-यांच्या भूमिकेवर आक्षेप एसटी महामंडळानं आक्षेप घेतला. एसटी जनउपयोगी सेवा पुरवत असून, कायद्यानुसार 45 दिवस अगोदर संपावर जाण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे. पण संघटनांनी 14 दिवस आधीच नोटीस देऊन कायद्याचं उल्लंघन केलं आहे, असा युक्तिवादही एसटी महामंडळानं न्यायालयात केला. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी महामंडळाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत संघटनांनी सकृतदर्शनी कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचं मान्य केलं. 

एसटी जनउपयोगी सेवा पुरवत असून, 70 लाख प्रवासी, 13700 मार्ग, 16500 बसेस इतके मोठे एसटीचे जाळे आहे. संप पुकारल्यामुळे ग्रामीण भागातली जनजीवन ठप्प झाले. खासगी बसेस ज्या भागात पोहोचत नाही, अशा ग्रामीण, दुर्गम भागात एसटी पोहोचते, गेले चार दिवस प्रवासी मुले, अपंग, रुग्ण, वृद्ध व्यक्तींचे हाल झाले आहेत. ग्रामीण भागातील परिवहन सेवा पूर्णपणे कोलमडली आहे, असे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवालाही दिला आहे. कर्मचा-यांवर काही प्रमाणात जरी अन्याय होत असला तरी समाजाला वेठीस धरून ते संप पुकारू शकत नाही. त्यांनी त्यांच्या तक्रारींचे निवारण संबंधित यंत्रणेकडून करून घ्यावे, त्यांच्याकडे दाद मागावी, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. एसटीच्या संपाचे ग्रामीण जनजीवनावर मोठे पडसाद उमटत असल्यानं, संघटना यंत्रणेकडे न्याय मागण्यास तयार नसल्यानं व कायद्याचे उल्लंघन केल्यानं मी हा संप बेकायदेशीर ठरवत आहे, असेही न्यायमूर्ती शिंदे यांनी नमूद केले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपCourtन्यायालय