शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

राजकारण्यांना उंदरांनीही छळले होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:01 IST

राजकारण्यांनी उंदरांसारखा देश पोखरला आहे असे टाळीबाज वाक्य नेहमी सभेत ऐकवले जाते. पण प्रत्यक्षात राजकारण्यांना उंदरांनी छळल्याची काही उदाहरणे देशभरात पाहायला मिळतात. तसे करण्यात उंदीर डावे-उजवे असा भेद करत नाहीत.

- समीर परांजपेमुंबई : राजकारण्यांनी उंदरांसारखा देश पोखरला आहे असे टाळीबाज वाक्य नेहमी सभेत ऐकवले जाते. पण प्रत्यक्षात राजकारण्यांना उंदरांनी छळल्याची काही उदाहरणे देशभरात पाहायला मिळतात. तसे करण्यात उंदीर डावे-उजवे असा भेद करत नाहीत.

रायटर्समधील सुळसुळाटपश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रायटर्स बिल्डिंग ब्रिटिश काळात बांधली गेली. थॉमस लायन या वास्तुविशारदाने १७७७ साली तिचा मुळ आराखडा तयार केला होता. नंतर या इमारतीमध्ये विस्तारही झाले. स्वातंत्र्यानंतर राज्य सरकारची अनेक कार्यालये याच इमारतीत सुरु झाली. ४ आॅक्टोबर २०१३पर्यंत या इमारतीतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय होते. पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते त्या काळातील गोष्ट आहे. रायटर्स बिल्डिंगमधल्या प्रत्येक कार्यालयामध्ये कागदपत्रांचा ढीग असल्याने तो माहोल उंदरांसाठी स्वर्गच होता. महत्वाची शासकीय कागदपत्रे उंदीर कुरतडत असत. त्यामुळे अशी कागदपत्रे फक्त राजकारणीच नष्ट करतात या आरोपातून तेव्हा तरी तत्कालीन माकप नेते सुटले असावेत! या उंदरांना मारण्याचे नानाविध उपाय योजून झाले पण काहीही उपयोग होत नव्हता. सरतेशेवटी या उंदरांचा खात्मा करण्यासाठी रायटर्स बिल्डिंगमध्ये ५० मांजरी पाळायचा निर्णय माकप सरकारने घेतला आणि मात्रा लागू पडली. या मांजरांनी रायटर्समधील उंदरांचा असा परिणामकारक रितीने फडशा पाडायला सुरुवात केली की बघता बघता काही हजार उंदीर यमसदनी गेले. उंदरांचा सुळसुळाट कमी झाला. गेल्या वर्षी जानेवारीतली गोष्ट आहे तीही कोलकातातीलच. डाव्यांना मनसोक्त छळल्यानंतर उंदरांनी ममता बॅनर्जी सरकारलाही सोडले नाही. पश्चिम बंगालच्या विधानसभा इमारतीत उंदरांनी धुमाकूळ घातला होता. खूप प्रयत्न करुनही त्यांची संख्या कमी होण्याचे काही कमी होत नव्हती. पश्चिम बंगालमधील तत्कालीन विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नान व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मानस भुनिया यांच्या कारच्या वायर उंदरांनी कुरतडल्या होत्या.मांझींना मिळालेले मुख्यमंत्रीपदराजकारणी व उंदीर या विषयाचा एक वेगळाच संबंध जुळून आला होता बिहारमध्ये. जितन राम मांझी हे बिहारचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून २० मे २०१४ रोजी विराजमान झाले खरे पण २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांना पायउतार व्हावे लागले. ते मुसहार या अनुसूचित जातीचे होते. मुसहार हे उंदीर पकडण्याचे काम करतात. ते बिहार, उत्तर प्रदेश, तराई, नेपाळ या भागात जास्त करुन आढळतात. समाजातील या दुर्बल घटकातील एका व्यक्तीला बिहारचे मुख्यमंत्रीपद मिळाले याबद्दल त्यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला होता. जितनराम मांझी यांनी आपण मुसहार जातीचे असल्याचा उल्लेख त्यावेळी जाहीरपणे केलाही होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र