शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मीटर नसतांनाही आली ३२ हजार भरण्याची नोटीस

By admin | Updated: February 10, 2017 03:55 IST

या तालुक्यात महावितरणचा गोंधळ सुरू असून मीटर नसतानाही एका ग्राहकाला ३२ हजाराचे थकीत बील आले आहे. २०० ग्राहकांना ते वीज वापरत

राहुल वाडेकर , विक्रमगडया तालुक्यात महावितरणचा गोंधळ सुरू असून मीटर नसतानाही एका ग्राहकाला ३२ हजाराचे थकीत बील आले आहे. २०० ग्राहकांना ते वीज वापरत असतांनाही बीलेच येत नाही. तर अनेकांना रिडींग न घेताच अवास्तव रकमेची बीले पाठविणे असे प्रकार सुरु आहेत. याबाबत तक्रार केल्यास तिची कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांच्या तक्रांरी निवरण करण्यास येथे कर्मचारी अपुरे असून अनेकांच्या तक्रारींचे निवारण कित्येक महिनो न महिने होत नाही. तालुक्याचा विस्तार पाहाता येथे तीन सेक्शन कार्यालयांची गरज असतांना एकच कार्यालय असल्याने त्यावर मोठा ताण पडतो आहे़ यामुळे मुंबई येथे राहाणारे कपिलेश्वर जयविजय बोडके यांना त्यांचे आलोंडा येथे घर वा वीज कनेक्शन नसतांनाही त्यांना ३२,५४४ रुपयांचे थकीत वीज बील आले असून ते तातडीने भरण्याची नोटीसही बजावली गेली आहे. याबाबत त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.कपिलेश्वर यांचे मूळ गाव आलोंडा असून येथे त्यांचे वडील अधूनमधून येत असतात. वडीलांच्या नावे येथे घर आहे व त्याला मिटर असून ते ही वडीलांच्या नावे आहे़ त्याची सर्व बिले वडील व्यवस्थीत भरत आहेत़ मात्र कपिलेश्वरांचे येथे घर नसतांना व त्यांचे वास्तव्य मुंबई येथे असतांनाही त्यांच्या नावे नोटीस बजावून त्यांना जव्हार येथील लोकन्यायालयात हजर राहून हे थकीतबील भरण्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते सतंप्त झाले असूून याबाबत त्यांनी महावितरण कार्यायास नोटीस मागे घेण्यासंदर्भात पत्र दिले असून ते याबाबत ग्राहकमंचाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच रामू वनशा वरठा रा़ चिंचघर-पाचमाड यांना देखील आकरण्यांत आलेले बिल हे त्यांच्या मीटरचे नसून दुस-याच कुणाच्या तरी मीटरचे आले असल्याने त्यांनी देखील कार्यालयकडे तशी लेखी तक्रार केली आहे़ त्याचप्रमाणे कृष्णा धावजी महाले रा़ भानपूर-वांगणपाडा यांच्या मीटरचे रिडींग घेण्यास गेल्या सहा महिन्यापासून कुणीही येत नाही अथवा बिल देण्यासही कुणी येत नाही. त्यांना सरासरी युनिटप्रमाणे बिलाची आकारणी होत असल्याने त्यांना वापरापेक्षा जास्त बिल येत आहे़. त्यामुळे ते देखील त्रस्त झाले असून त्यांनीही तक्रार केली आहे़जवळजवळ २०० हून अधिक ग्राहक असे आहेत. की त्यांना बिलच येत नाही़ त्यांच्या नावे मीटरच नाही. मीटर एकाचे त्याचे बील दुसऱ्याला असा गोंधळ सुरू आहे़ येथे अपुरे कर्मचारी आहेत़ तर उपलब्ध कर्मचा-यापैकी मोजकेच कर्मचारी कामाचे आहेत़ तालुक्याचा भार सांभळतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे़ मात्र ग्राहकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ मिटर नसतांना बिले आकारणे बंद करावे, तक्रारीचे योग्यवेळी निरसन व्हावे व रिक्त पदे भरावीत अशा विविध मागण्या ग्राहकांनी केल्या आहेत़