शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

लोकसभेला फटका, तरी थांबेना कांद्याचा खेळखंडोबा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 08:08 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा पिकाने सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचा वांदा केल्यानंतरही केंद्र सरकारकडून कांद्याचा खेळखंडोबा सुरूच आहे.

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक: एखाद्या शेतमालाचे, त्याचे उत्पादन ए घेणाऱ्या शेतकऱ्यांचे, त्याचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिक, निर्यातदारांचे कसे वाटोळे करायचे, याचे गेल्या १० वर्षातील कांदा हे पीक दुर्दैवाने आदर्श उदाहरण ठरले आहे. केंद्र सरकारच्या धोरण लकव्याचा सर्वाधिक फटका कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. कधी काळी नगदी पीक असलेला कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून सातत्याने पाणी काढत आहे.

आता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कांदा खरेदी करताना त्याचे दर ठरविण्याचे नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) व एनसीसीएफ (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) यांचे अधिकार काढून घेतले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयानेच २ जून रोजी प्रतिकिलोचा दर २१ रुपये ०५ पैसे निश्चित केला आहे. रोज दर ठरण्याऐवजी आता आठवड्धाचे दर केंद्रीय स्तरावरून ठरविले जातील. नाफेडच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदी करत आहेत. सरकारी खरेदीत विळा लागलेला कांदा चालत नाही, कांद्याचे टरफल निघालेले नको, अशा भरमसाठ अटी असतात.  म्हणजे थोडक्यात निर्यातक्षम कांदा लागतो. मात्र निर्यातक्षम कांद्याला बाजार समितीत क्विंटलमागे २,७०० रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.

सरकारी कांदा खरेदी केवळ १० टक्के

भाव स्थिरीकरण निधीतून नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून केंद्र सरकारने ५ लाख कांदा खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले. ● मात्र या दोन्ही संस्थांच्या खरेदीत कोणतीही पारदर्शकता नाही. बाजार समितीत कांदा खरेदी होत नसल्याने खरेदीलाही मर्यादा आल्या आहेत.

महिनाभरात या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून केवळ १७ हजार टन कांद्याची खरेदी झाल्याचे समजते. ही १० टक्केही खरेदी नाही. त्याची अधिकृत आकडेवारी वेळोवेळी जाहीर होण्याची गरज आहे.

कोंडी फोडण्यासाठी

- कांद्याची सरकारी खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीत करावी. त्यामुळे स्पर्धा वाढेल आणि शेतकयांच्या कांद्याला चांगले दर मिळतील

- नाफेड व एनसीसीएफने ४ हजार रूपये क्चिटल दराने कांदा खरेदी करावी.

शेतकऱ्यांना परवडेनात २ जूनचे भाव

२ जूनला केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने क्विंटलमागे जाहीर केलेले २,१०५ रुपये भाव आता स्पर्धात्मक राहिलेले नाहीत.

१ जूनला लासलगाव बाजार समितीत कांद्याचे क्विंटलमागे जास्तीत जास्त दर २,१६८ रुपये होते, आता ते दर २,७८५ रुपये झाले आहेत.

त्यामुळे सरकारी खरेदीचे २,१०५ रुपये दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. सरकारी दरापेक्षा चांगले दर बाजार समितीत मिळत आहेत.

टॅग्स :onionकांदा