शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरकारच्या आदेशानंतरही खात्यांतर्गत पीएसआयची नियुक्ती रखडलेलीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:50 IST

अनेक अंमलदार प्रतीक्षेत झाले निवृत्त; ८७५ पदांबाबत भरतीत मुख्यालयाची सुस्ताई असल्याची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीसाठी विभागीय अहर्ता परीक्षा - २०१३ मधील पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, असे आदेश गृहविभागाने देऊनही पोलीस महासंचालक कार्यालयाची सुस्ताई कायम असल्याची नाराजी लाभार्थ्यांमध्ये आहे. नियुक्तीबाबत समितीची अंतिम बैठक होऊन दोन महिने उलटूनही कार्यवाहीसाठी आस्थापना विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. सात वर्षांपासूनच्या या प्रतीक्षेत अनेक अंमलदार दर महिन्याला निवृत्त होत आहेत.खात्यामार्फत २०१३ मधील पीएसआय पदाच्या विभागीय अर्हता परीक्षेबाबत अनेक वर्षे न्यायालयीन वाद सुरू राहिल्यानंतर ‘मॅट’च्या आदेशानुसार, त्या घटकातील रिक्त पदाच्या पदोन्नतीसाठी गेल्या वर्षी जानेवारीत मुख्यालयाने सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, त्याची कार्यवाही झाली नाही.त्यानंतर, सरकारने नोव्हेंबरमध्ये ८७५ पोलीस उपनिरीक्षक पदाची रिक्त पदे भरण्यासाठी महासंचालकांना लेखी कळविले. त्यानुसार, जून, २०२० मध्ये जिल्हा घटकाकडून माहिती मागविण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील ३१८ पोलिसांचा समावेश आहे. एकूण पदे भरण्याबाबत १५ जुलैला समितीची बैठक झाली. मात्र, त्याला दोन महिने उलटूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.मुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडे तक्रारसरकारच्या आदेशानंतरही रखडलेल्या नियुक्तीबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविले आहे. एकीकडे राज्य सरकार नवीन पोलीस भरतीबाबत घोषणा करत आहे, पण दुसरीकडे पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील हवालदारांना न्याय देताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Policeपोलिस