शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

२६ जुलै २००५ पेक्षा काल खूप कमी प्रमाणात पाऊस पडला तरी सुद्धा महानगरपालिका संपूर्णतः फेल ठरली - संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 19:40 IST

मुंबई, दि. 30-  मनपा आयुक्त आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २६ जुलै २००५ ची तुलना २९ ऑगस्ट २०१७ ...

मुंबई, दि. 30-  मनपा आयुक्त आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २६ जुलै २००५ ची तुलना २९ ऑगस्ट २०१७ शी करत आहेत परंतु ते हे विसरलेले आहेत कि २६ जुलैला एका तासात ९४४ एमएम पाऊस पडला होता आणि काल बारा तासात ३२० एमएम पाऊस पडला होता. २६ जुलै पेक्षा काल त्यामानाने खूप कमी पाऊस पडलेला आहे आणि तरीही मुंबईची अवस्था यावेळी ही दयनीय झाली आहे. मुंबईचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले  आहे. मुंबई पाण्यामध्ये बुडाली होती. प्रत्येक वेळी निसर्गाला आणि पावसाळा दोष देऊन हे सरकार स्वतःच्या जबाबदारीतून हात झटकत आहेत.  मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या या परिस्थितीला शिवसेना आणि भाजप सरकारच जबाबदार आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.  

ते पुढे म्हणाले कि काल दिवसभराच्या पावसामुळे पूर्ण मुंबई ठप्प झालेली आहे. रेल्वे सेवा बंद पडलेली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. हिंदमाता परिसरात  ४ ते ५ फूट पाणी साचलेले आहे. केइएम हॉस्पिटलमध्ये पाणी भरलेले आहे. अंधेरी सबवे आणि वरळी सी लिंक मार्ग बंद करण्यात आलेला आहे. संपूर्ण मुंबईभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. या सर्व परिस्थितीला मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजप सरकार व महापालिका आयुक्त अजोय मेहता जबाबदार आहेत. यांच्यामुळे मुंबई तुंबलेली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने ६ पंपिंग स्टेशन्स बसवलेले आहेत. ज्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. पंपिंग स्टेशन्सची क्षमता वाढवलेली नाही. ते नादुरुस्त झाले आहेत. महापालिकेतील शिवसेना-भाजप सरकारने ते पैसेसुद्धा खाल्ले. १२ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार असताना केंद्र सरकारकडून वादळी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी  BRIMSTOWAD प्रोजेक्ट अंतर्गत महापालिकेला १६०० कोटी रुपये देण्यात आले होते. याचे फक्त ४०% काम पूर्ण झालेले आहे.

महापालिकेद्वारे दरवर्षी सुमारे २ हजार कोटी रुपये ड्रेनेज सिस्टिमसाठी खर्च केले जातात. ४०० कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले जातात. तरीही मुंबई तुंबलेलीच आहे. ही महापालिकेकडून शिस्तबद्ध पद्धतीने केलेली लूट आहे. हिंदमाताजवळ पाणी साचणे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पश्चिम उपनगरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे खोदकाम करण्यात आले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे निर्माण झालेले आहेत. या सरकारने खूप मोठा रस्ते घोटाळा केलेला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरामधील लोकांचेही फार हाल झालेले आहेत. मुंबईकरांना पुन्हा एकदा २६ जुलै ची आठवण झालेली आहे. त्यातच भरीस भर म्हणून मुंबई महापालिकेचे आपत्कालीन  व्यवस्थापन विभागाचे प्रमुख दीर्घकालीन सुट्टीवर गेले आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग परिस्थिती आवाक्यात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले कि जर नालेरुंदीकरण आणि ड्रेनेज सिस्टीमवर सरकारने योग्य पद्धतीने भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम केले असते, तर मुंबईची अशी दयनीय अवस्था झाली नसती. या सरकारने फक्त भ्रष्टाचार केला. पैसे खाल्ले. त्यामुळेच आज सर्व मुंबईकर अडचणीत सापडलेले आहेत. मुंबईकर नियमित प्रामाणिकपणे टॅक्स भरतात. परंतु त्यांना सामान्य सुखसोईसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिका चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महानगरपालिकेची सत्ता सोडून द्यावी. 

संजय निरुपम पुढे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी महापालिका आयुक्त म्हणाले होते की, पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. हा त्यांचा दावा पूर्णपणे फोल ठरलेला आहे. मनपा आयुक्त सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत.त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहे की, महापालिका आयुक्त अजोय मेहता याना लाथ मारून या पदावरून हाकलले पाहिजे. मनपा आयुक्त बोगस ठरले आहेत. त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार