शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना

By admin | Updated: June 11, 2017 18:36 IST

आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 11 -  मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊन ५७ वर्षाचा कालावधी लोटला पण अजूनही मराठवाडा विकासात हजारो मैल दूरच आहे. येथील अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होत असून तो कधी दिवस सहन करायचा. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना  करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली. स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी रविवारच्या मुहूर्तावर एका बैठकीत बीजरोपण करण्यात आले. यावेळी चंद्रभान पारखे, द्वारकाभाऊ पार्थीकर, प्रा.बाबा उगले, प्रा.एस.ए.सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. जे.के.जाधव यांनी सांगितले की, मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी आम्ही दोन पातळीवर लढा देणार आहोत. यात अभ्यासगटासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करुन विविध पुस्तके, लेख प्रकाशित करणे व माहितीपत्रीका प्रकाशित करुन जनजागृती करणे व शासनाला अहवाल देणे दुसरे ठोस कृतीकार्यक्रमाद्वारे चळवळ उभी करणे, आंदोलन, मोर्चा, धरणे करण्यात येतील. यासंदर्भात १८ रोजी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. २० रोजी विभागीय आयुक्ताना निवेदन देण्यात येईल व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर अगोदरचे तीन दिवस चक्री उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. या दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठवाडावादी लोकांच्या बैठकाघेऊन जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहे. प्रा.उगले म्हणाले की, प्रा.उगले म्हणाले की, जगात ६० देश असे आहेत की, ते मराठवाड्यापेक्षा लहान आहेत. मराठवाड्यात ३०० लहान-मोठे पर्यटनस्थळ आहेत येथे अग्रीकल्चर हब होऊ शकते. स्वतंत्र मराठवाडा केल्यास आम्ही चांगला संसार करुन दाखवू. त्यासाठी आता भीक मागायची सवय सोडा, पुळचट वागणे सोडा, मागणीपूर्ण करण्यासाठी हाणामारी, तोडण्याशिवाय पर्याय नाही. द्वारकाभाऊ पार्थीकर यांनी सांगितले की, हौस म्हणून नाही तर अन्याय होतो म्हणून मराठवाडा स्वतंत्र पाहिजे ही आमची भूमिका आहे. डॉ.भगवानदास कापसे म्हणाले की, वेगळा झाल्यानंतर काय फायदे होतील, हे मराठवाड्यातील जनतेला पटवून द्यावे लागेल. तरच जनता या आंदोलनात उतरेल. प्रा.एस.ए.सत्तार यांनी सूचना दिली की, एकामेकांना भेटल्यावर आपण ह्यजय मराठवाडाह्ण असे म्हटले पाहिजे. वर्षान्वर्ष विकास होत नसल्याने मराठवाड्यातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पंजाबराव वडजे म्हणाले. के.ई.हरिदास म्हणाले की, नागपूर करारा अंतर्गत विदर्भ व मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला जर विकास होत नसल्याने विदर्भ बाहेर पडत असेल तर मराठवाडानेही स्वतंत्र राज्याची मागणी करणे योग्य आहे. विकासासाठी अभ्यास गट स्थापन करुन काही होत नाही. मराठवाड्याचे वेगळे राज्य हीच मागणी आता धरून लढले पाहिजे, असा सल्ला श्रीकात उमरीकर यांनी दिला. यावेळी ओमप्रकाश वर्मा,सुनिल ठाकरे,डी.एस.बनकर,जी.एस.गायकवाड, प्रा.प्रशांत अवचरमल, एन.टी.जोशी,रमेश चव्हाण,रंगनाथ शेजवळ, प्रा.भागवत जमादार,चंद्रकांत भराड आदींची उपस्थिती होती.  २ लाख ३० हजार कोटीचा अनुशेष गं.आ.नागरे यांनी सांगितले की, मराठवाड्याचा अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊ पोहोचला आहे. यात सिंचन ५५ हजार कोटी, रस्ते ३९०० कोटी, उद्योग १२५००० कोटी, कृषी २५००० कोटी, कृषी प्रक्रिया उद्योग १०००० कोटी, सहकार १३०० कोटी, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण १हजार कोटी,शिक्षण १ हजार कोटी,वीज ७४१९ कोटी, पर्यटन १ हजार कोटींचा अनुशेष निर्माण झाला असून अशाने विभागाविभागात समतोल कसा साधणार असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.  स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रिमंडळ प्राचार्य गायकवाड यांनी यावेळी स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रीमंडळही जाहीर करून टाकले. यात मुख्यमंत्री द्वारकाभाऊ पार्थीकर तर अर्थमंत्री म्हणून जे.के.जाधव यांचा उल्लेख करताच हास्य पिकले.