शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना

By admin | Updated: June 11, 2017 18:36 IST

आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 11 -  मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होऊन ५७ वर्षाचा कालावधी लोटला पण अजूनही मराठवाडा विकासात हजारो मैल दूरच आहे. येथील अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. प्रत्येक बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होत असून तो कधी दिवस सहन करायचा. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भा सोबत मराठवाड्याचा समतोल विकास साधणे अशक्य असून आता महाराष्ट्रापासून मराठवाडा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यासाठी लढा देण्या करीता ह्यस्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची स्थापना  करण्यात आल्याची घोषणा मराठवाडा विकास मंचे अध्यक्ष जे.के.जाधव यांनी केली. स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी रविवारच्या मुहूर्तावर एका बैठकीत बीजरोपण करण्यात आले. यावेळी चंद्रभान पारखे, द्वारकाभाऊ पार्थीकर, प्रा.बाबा उगले, प्रा.एस.ए.सत्तार आदींची प्रमुख उपस्थिती होती. जे.के.जाधव यांनी सांगितले की, मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी आम्ही दोन पातळीवर लढा देणार आहोत. यात अभ्यासगटासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करुन विविध पुस्तके, लेख प्रकाशित करणे व माहितीपत्रीका प्रकाशित करुन जनजागृती करणे व शासनाला अहवाल देणे दुसरे ठोस कृतीकार्यक्रमाद्वारे चळवळ उभी करणे, आंदोलन, मोर्चा, धरणे करण्यात येतील. यासंदर्भात १८ रोजी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. २० रोजी विभागीय आयुक्ताना निवेदन देण्यात येईल व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर अगोदरचे तीन दिवस चक्री उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. या दरम्यान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठवाडावादी लोकांच्या बैठकाघेऊन जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहे. प्रा.उगले म्हणाले की, प्रा.उगले म्हणाले की, जगात ६० देश असे आहेत की, ते मराठवाड्यापेक्षा लहान आहेत. मराठवाड्यात ३०० लहान-मोठे पर्यटनस्थळ आहेत येथे अग्रीकल्चर हब होऊ शकते. स्वतंत्र मराठवाडा केल्यास आम्ही चांगला संसार करुन दाखवू. त्यासाठी आता भीक मागायची सवय सोडा, पुळचट वागणे सोडा, मागणीपूर्ण करण्यासाठी हाणामारी, तोडण्याशिवाय पर्याय नाही. द्वारकाभाऊ पार्थीकर यांनी सांगितले की, हौस म्हणून नाही तर अन्याय होतो म्हणून मराठवाडा स्वतंत्र पाहिजे ही आमची भूमिका आहे. डॉ.भगवानदास कापसे म्हणाले की, वेगळा झाल्यानंतर काय फायदे होतील, हे मराठवाड्यातील जनतेला पटवून द्यावे लागेल. तरच जनता या आंदोलनात उतरेल. प्रा.एस.ए.सत्तार यांनी सूचना दिली की, एकामेकांना भेटल्यावर आपण ह्यजय मराठवाडाह्ण असे म्हटले पाहिजे. वर्षान्वर्ष विकास होत नसल्याने मराठवाड्यातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पंजाबराव वडजे म्हणाले. के.ई.हरिदास म्हणाले की, नागपूर करारा अंतर्गत विदर्भ व मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला जर विकास होत नसल्याने विदर्भ बाहेर पडत असेल तर मराठवाडानेही स्वतंत्र राज्याची मागणी करणे योग्य आहे. विकासासाठी अभ्यास गट स्थापन करुन काही होत नाही. मराठवाड्याचे वेगळे राज्य हीच मागणी आता धरून लढले पाहिजे, असा सल्ला श्रीकात उमरीकर यांनी दिला. यावेळी ओमप्रकाश वर्मा,सुनिल ठाकरे,डी.एस.बनकर,जी.एस.गायकवाड, प्रा.प्रशांत अवचरमल, एन.टी.जोशी,रमेश चव्हाण,रंगनाथ शेजवळ, प्रा.भागवत जमादार,चंद्रकांत भराड आदींची उपस्थिती होती.  २ लाख ३० हजार कोटीचा अनुशेष गं.आ.नागरे यांनी सांगितले की, मराठवाड्याचा अनुशेष २ लाख ३० हजार कोटींवर जाऊ पोहोचला आहे. यात सिंचन ५५ हजार कोटी, रस्ते ३९०० कोटी, उद्योग १२५००० कोटी, कृषी २५००० कोटी, कृषी प्रक्रिया उद्योग १०००० कोटी, सहकार १३०० कोटी, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण १हजार कोटी,शिक्षण १ हजार कोटी,वीज ७४१९ कोटी, पर्यटन १ हजार कोटींचा अनुशेष निर्माण झाला असून अशाने विभागाविभागात समतोल कसा साधणार असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.  स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रिमंडळ प्राचार्य गायकवाड यांनी यावेळी स्वतंत्र मराठवाड्याचे मंत्रीमंडळही जाहीर करून टाकले. यात मुख्यमंत्री द्वारकाभाऊ पार्थीकर तर अर्थमंत्री म्हणून जे.के.जाधव यांचा उल्लेख करताच हास्य पिकले.