शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ मंत्रिगट स्थापन करा, वरिष्ठ मंत्र्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 04:56 IST

राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षाच्या नेत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कारोनाचा फैलाव अनेक जिल्ह्यांमधील परिस्थिती आणि मंत्रालयातून होणारे निर्णय यांचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. त्यामुळे तातडीने कोरोना निवारण मंत्रीगटाची स्थापना करा किंवा आहे त्या मंत्रीगटाला रोजच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घ्या, अशी मागणी वरिष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी मुख्यमंत्री इतर मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षाच्या नेत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. आज सगळे निर्णय ठराविक अधिकारी घेत आहेत, त्यातही अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. उद्या जर परिस्थिती बिघडली तर हेच अधिकारी हात वर करतील आणि मंत्री व राजकीय नेते म्हणून आपल्याला उत्तरे देत बसावे लागेल. ती वेळ येऊ द्यायची नसेल तर तातडीने मंत्रीगट स्थापन करुन त्यांच्यासोबत सतत बैठका घ्याव्या लागतील, त्यांच्याकडून ह्यग्राऊंड रिएलिटीह्ण समजून घ्यावी लागेल त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही असेही त्या मंत्र्याने स्पष्ट केले.

सरकार स्थापन झाले त्यावेळी राष्टÑवादीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर शिवसेनेमधून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई तर काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. कमिान या समितीची बैठक व्हायला हवी, मंत्रीगट नाही तरी या सहाजणांची समिती करुन ती कार्यान्वित करण्याची व त्यांचा रोजच्या निर्णयप्रक्रीयेत सहभाग होणे गरजेचे आहे असे काही मंत्र्यांचे म्हणणे आहे.

याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही सगळे मंत्री एकमेकांच्या संपर्कात आहोतच, मुख्यमंत्री ठाकरे स्वत: आमच्याशी दिवसातून दोनवेळा बोलत असतात. परंतु असा मंत्रीगट असायला हवा. त्यामुळे रोजच्या कामकाजात सुसुत्रता येणे सोपे होते. उद्या आम्हा मंत्र्यांची एक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सवर होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचेही थोरात म्हणाले. अनेक एनजीओ आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नेते या संकटाच्या वेळी रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करत आहेत, भुकेलेल्यांना अन्न देत आहेत. मात्र हा लढा १४ तारखेपुरता मर्यादित नाही. त्यामुळे त्यांनी देखील हा लढा पुढे काही दिवस चालू ठेवण्याची मानसिकता करण्याची गरज असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.

नर्सेस, वॉर्डबॉयना प्रशिक्षण द्याकोरोनाचे रुग्ण कसे हाताळायचे, त्यासाठी कोणते मास्क कोणत्या ठिकाणी घालायचे याची माहिती जरी डॉक्टर्स आणि अन्य लोकांना दिलेली असली तरी शेवटच्या टप्प्यापर्यंत मृत रुग्णाचे शरीर कसे हाताळायचे, त्यासाठी या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकापर्यंत ही माहिती व प्रशिक्षण झालेले नाही, ते तातडीने करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस