शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

अनेक धरणांत आढळल्या त्रुटी!

By admin | Updated: July 18, 2015 00:09 IST

राज्यातील सुमारे ४०० धरणे धोकादायक असल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या वेळी झाली.

मुंबई : राज्यातील सुमारे ४०० धरणे धोकादायक असल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या वेळी झाली. सरकारच्या धरणविषयक समितीने केलेल्या पाहणीत राज्यातील ४०० धरणांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हा मुद्दा आज सुभाष पाटील, धैर्यशील पाटील व जिवा पांडू गावित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. टेमघर आणि वरसगाव या धरणांची स्थिती अतिशय नाजूक असल्याने याबाबत तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर या धरणांची पाहणी आपण स्वत: करू, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. धरणांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आवश्यक आहे याचा अभ्यास करून तो वेगळा राखून ठेवण्याबाबतचा विचार करण्यात येईल, असे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.टेमघर धरण २०१०मध्ये बांधून पूर्ण झाले; मात्र त्यात खूप गळती असल्याचे दिसून आले आहे. याची तत्काळ दुरुस्ती करण्यास ठेकेदारास सांगण्यात आले होते. मात्र वारंवार नोटीस बजावूनही त्याने दखल घेतलेली नाही. म्हणून सरकारने स्वत:च्या निधीतून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत हे काम करण्यास भाग पाडण्यात येईल, असे गिरीश महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)धरणस्थिती अहवालात १२२६ धरणांपैकी यवतमाळमधील निगनूर, रायगडमधील आंबेघर व कुडकी या तीन धरणांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यापैकी कुडकी धरणाची दुरुस्ती झाली असून, निगनूर व आंबेघर धरणाची दुरुस्ती करायची असून, या धरणांना अद्याप धोका निर्माण झालेला नसल्याची माहिती विजय शिवतारे यांनी दिली. शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी या वेळी धरणांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवा, अशी मागणी केली.