शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नाशिकमध्ये उपक्रम : दर शनिवारी ‘दप्तराला’ सुटी

By admin | Updated: September 26, 2016 23:19 IST

ते शनिवारी खूप खूश असतात. दप्तर नाही की शाळेत अभ्यासाचा त्रास नाही, कुणी खेळतंय, तर कोणी वाचन करतंय, कोणी प्रयोग करतोय, तर कुणी विविध वस्तू हाताळतोय..

संजय पाठक

नाशिक,दि. २६ : ते शनिवारी खूप खूश असतात. दप्तर नाही की शाळेत अभ्यासाचा त्रास नाही, कुणी खेळतंय, तर कोणी वाचन करतंय, कोणी प्रयोग करतोय, तर कुणी विविध वस्तू हाताळतोय...शाळेत अशा प्रकारची मजा अनुभवणारी ही मुले आहेत महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील ! गेल्या महिनभरापासून मंडळाने शनिवारी दप्तराला सुटी उपक्रम राबविला असून, पर्यायी ज्ञानाची साधने उपलब्ध करून दिल्याने मुलांचे शनिवारी शाळेत येण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शाळकरी विद्यार्थ्यांवर दप्तराच्या ओझ्याचा विषय गाजत आहे. वह्या-पुस्तकांचे जड ओझे वागवणारे विद्यार्थी मान आणि पाठेच्या विकारांमुळे त्रस्त आहे. जड दप्तर नेणे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने शाळांना दप्तराचे ओझे कमी करण्याच्या सूचना करतानाच अनेक शाळांमध्ये दप्तर तपासणीही केली. त्यामुळे आता शाळा विविध उपक्रम राबवित आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका शिक्षण मंडळाने गेल्या महिनाभरापासून दप्तराला सुटीचा प्रयोग सुरू केला आहे. मनपा शिक्षण मंडळाच्या १२८ शाळेतील सुमारे ३२ हजार मुले त्यामुळे शनिवारी आनंददायी पद्धतीने ज्ञानार्जन करीत आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्ये येताना दर शनिवारी दप्तराची सुटी दिल्यानंतर मुलांचा अभ्यास होत नाही असे नाही, तर त्यांना अन्य प्रकारचे शिक्षण दिले जाते. कला, खेळ आणि कार्यानुभव हे तीन विषय प्रामुख्याने शिकविले जातात. त्यामुळे मुले चित्रे काढतात, वेगवेगळे खेळ खेळतात शिवाय कार्यानुभवाच्या माध्यमातून विविध वस्तू दुरुस्त करणे आणि अन्य कामेही करतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण मंडळाने मानधन, तासिकेवर शिक्षक नियक्त केले असून, तेच प्रामुख्याने हे विषय हाताळतात. भाषा आणि गणिताचे तासही होतात. परंतु तेही हसत खेळत! भाषेच्या तासाला अवांतर वाचन करून घेतले जाते. समजा, कोणत्याही विद्यार्थ्याला पाठ्यक्रमाचे पुस्तक लागलेच तर शाळेत तसे अतिरिक्त पुस्तके असल्याने अध्यापनात व्यत्यय येत नाही. गेल्या महिनाभरापासून हा उपक्रम सुरू असून, त्यामुळेच मुलांची शनिवार - रविवार अशी सलग सुटी घेण्याची मानसिकता कमी झाल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले.मुलांचा सकारात्मक प्रतिसादमनपा शिक्षण मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे मुले समाधानी असून, अध्ययनात रस घेत आहेत. दफ्तर न आणता मुले शाळेत येतात आणि सर्वच उपक्रमात सहभागी होतात.