शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

राज्यात बकरी ईदचा उत्साह, ठिकठिकाणी नमाजचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 10:31 IST

आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जाते आहे.

ठळक मुद्देआज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जाते आहे. राज्यामध्येही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे

मुंबई, दि. 2- आज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जाते आहे. राज्यामध्येही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. बकरी ईदच्या निमित्ताने नमाज अदा करण्यासाठी ठिकठिकाणी मुस्लिम मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. तसंच ईदच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत. मुंबई, नाशिक, मालेगाव, सोलापूरमध्ये सकाळपासून नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती. 

नाशिकच्या  शहाजनी ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठी गर्दी केली. नाशिक शहर हिसामुद्दीन अश्रफी यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आलं. यावेळी इदगाह मैदानावर ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून टीका करण्यात आली. तसंच सर्व दहशतवादी संघटनांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आल्या. दहशतवादाविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. या मैदानावर असा निश्चय करा की आपण आपल्या जोडीदाराला कधीही तलाक देणार नाही, असं आवाहन यावेळी धर्मगुरूंनी केलं. तीन तलाक हे इस्लामला मान्य नाही, आयुष्यामध्ये कोणीही कोणाला तलाक देऊ नये. तलाक सारखं मोठं पाप करु नये, असंही यावेळी धर्मगुरू म्हणाले. 

तर मालेगावमध्येही बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळाला. शहरातील मुख्य ईदगाह येथे मौलाना इम्तियाज एकबाल यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे दहा हजारावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. नमाज नंतर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार सुरेश कोळी, मनपा उपायुक्त विलास गोसावी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ईद-उल-अजाहची नमाज सकाळी लवकर होत असल्याने शहरातील मशिदीत सकाळी सातपासून नमाजला सुरुवात झाली होती. मुख्य ईदगाह येथे साडेआठ वाजता नमाजला सुरुवात झाली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छाआज देशभरात मुस्लिम मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुस्लिमांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईदच्या शुभेच्छा, आपल्या समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि सुसंवादाची भावना वाढत राहो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.