शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

वाढीव पाणी करारनाम्यात बंद

By admin | Updated: January 18, 2017 04:03 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस १७० दशलक्ष लीटर वाढीव पाणी देण्याच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने गेल्यावर्षीच मंजुरी दिली.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेस १७० दशलक्ष लीटर वाढीव पाणी देण्याच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने गेल्यावर्षीच मंजुरी दिली. मात्र त्याचा करारनामा अद्याप न झाल्याने वर्ष उलटूनही वाढीव पाणी कागदावरच राहिले आहे. हा करार तातडीने करावा, यासाठी लघू पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्यांकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला; पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे पाणी कपातीचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदी पात्रातून २३४ दशलक्ष लीटर पाणी उचलते. या व्यतिरिक्त काळू नदीतून चार दशलक्ष लीटर पाणी उचलते. मात्र पालिकेची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात गेली आहे. तिला पाणी पुरवण्यासाठी उल्हास नदीपात्रातून मंजूर पाण्याच्या कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ३१० दशलक्ष लीटर म्हणजे ७६ दशलक्ष लीटर जादा पाणी उचलावे लागते. त्याला लघू पाटबंधारे खात्याची मंजूरी नाही. पण ते न उचलल्यास कल्याण, डोंबिवली शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे अतिरिक्त पाणी उचलण्यास मंजुरी देण्याची मागणी गेले वर्षभर पालिका करते आहे. त्याला संबंधित खात्याने तात्पुराती मंजुरी दिली. पण कायमस्वरूपी पाणी उचलता येत नसल्याने हा प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन आहे. यानंतर ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदरने दिलेले प्रस्ताव मार्गी लागले, पण कल्याण-डोंबिवलीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.उल्हास नदीतून पाणी उचलून एमआयडीसी नवी मुंबईला १४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करत होती. नवी मुंबईचे पालिकेचे स्वत:चे मोरबे धरण झाल्यावर त्यांची या पाण्याची गरज संपली. त्यामुळे हे पाणी कल्याण-डोंबिवली पालिकेस वळते करावे, या निर्णयाला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी २००८ मध्येच तत्वत: मान्यता दिली. तो निर्णय अजून अंमलात आलेला नाही. हे १४० दशलक्ष लीटर आणि वाढीव ३० दश लक्ष लीटर अशा १७० दशलक्ष लीटरचा हा प्रस्ताव आहे. त्यासाठी पुन्हा लघू पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. उच्चाधिकार समितीने दोन वर्षांपूर्वी पाणीसाठा वाढवून देण्यास हिरवा कंदील दाखवत तो मंजूर केला. एमआयडीसी, लघूपाटबंधारे खाते व महापालिकेने त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र त्याचा करारच अद्याप झालेला नाही. >गावांच्या पाण्यासाठी गरजसध्या पालिकेचा मंजूर कोटा २३४ दशलक्ष लीटर आहे. त्यात हा १७० दशलक्ष लीटर पाणी वाढल्यास तो कोटा ४०० दशलक्ष लीटर होईल. सध्या २७ गावांना एमआयडीसी ३० दशलक्ष पाणी पुरवते. गावांची गरज ५० दशलक्ष लीटरची आहे. हा पाणीपुरवठा पालिकेकडे आला, तर पालिकेला रोज ३५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याची गरज भासेल. त्यामुळे हा ४०० दशलक्ष लीटरचा करार मंजूर होणे गरजेचे आहे. २७ गावांच्या पाण्यासाठी पालिकेने अमृत योजनेअंतर्गत केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. तो ५० कोटींच्या खर्चाचा आहे. त्यालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. >बारवीच्या पाण्यावरही लक्षबारवीची उंची वाढविल्यानंतर त्याची क्षमता २४० दशलक्ष घनमीटर झाली आहे. यंदा पाणीसाठा वाढल्याने पाणीटंचाईचे संकट टळेल, असे सांगितले जात होेते. तरीही एक दिवसाची पाणीकपात आहे. यासाठी उन्हाळ््यात ही कपात वाढू शकते. त्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहेत. हा विषय मार्गी लागला नाही, तर त्यांच्या मागण्यांच्या गर्दीत कल्याण-डोंबिवलीची वाढीव पाण्याची मागणी विरुन जाण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटते.