शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

आर्थिक वर्षाच्या शेवटी होणाऱ्या हातघाईला लागणार चाप, १५ फेब्रुवारीनंतर खर्च करण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 05:35 IST

हा आदेश १५ फेब्रुवारीपासून वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ३१ मार्चपर्यंत लागू राहील.

मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेऊन आता वित्त विभागाने १५ फेब्रुवारीनंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असे आदेश काढले आहेत.

हा आदेश १५ फेब्रुवारीपासून वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ३१ मार्चपर्यंत लागू राहील. विविध सरकारी कार्यालयांमधील फर्निचरची दुरुस्ती, संगणक व इतर दुरुस्ती, कार्यशाळा आयोजित करणे, कार्यालयाची जागा भाड्याने घेण्याचे प्रस्ताव सादर करू नयेत असेही बजावण्यात आले आहे. 

आदेशात काय आहे...जिल्हा वार्षिक योजना तसेच लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून खरेदी करण्याचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करता येतील. मात्र, त्यावर प्रकरणानुसार निर्णय घेण्याचे अधिकार वित्त विभागाला असतील.१५ फेब्रुवारीनंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. मात्र निविदा १५ फेब्रुवारीपूर्वी प्रसिद्ध झाली असेल तर त्यासाठीची पुढील प्रक्रिया करता येईल.हा आदेश सर्व शासकीय कार्यालये महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था यांना राज्य सरकारने दिलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी लागू असेल. औषध खरेदीसाठी मात्र आदेश लागू राहणार नाही. पुढील वर्षी आवश्यक असलेल्या वस्तूंची १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या काळात आगाऊ खरेदी करता येणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र