शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

एका दहशतीचा अंतच...

By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST

संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला.

अक्कू यादवचा खात्मा : न्यायालयातील थराराला दहा वर्षे पूर्णराहुल अवसरे - नागपूर संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला. संपूर्ण देशात बहुचर्चित ठरलेल्या या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.१३ आॅगस्ट २००४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये ही थरारक घटना घटना घडली होती. जरीपटक्यातील कस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही कायदा मोडून तो गुन्हेगारीत सक्रिय होता. ७ आॅगस्ट २००४ ही त्याची अखेरची अटक ठरली. ८ आॅगस्ट रोजी त्याला न्यायालयात आणण्यात आले असता, त्याचाच एक साथीदार बिपीन बालाघाटी हा त्याला भेटण्यास आला होता. कपडे व टिफीनच्या आड तो अक्कूला चाकू देत असताना पकडल्या गेला होता. त्यानंतर अक्कूला १० आॅगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच दिवशी त्याच्या खात्म्याची योजना होती. परंतु ती तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादवमुळे फिसकटली होती. १३ आॅगस्ट रोजी अक्कू आणि आणखी तीन आरोपींना हातकड्यांमध्ये हेड कॉन्स्टेबल दामोदर चौधरी यांच्यासह तीन पोलिसांनी न्यायालयात आणले होते. त्याच वेळी २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांचा संतप्त जत्था अक्कूच्या दिशेने सरसावला होता. अक्कू आणि साथीदारांना आत घेऊन पोलिसांनी दगडी इमारतीचे चॅनल गेट बंद केले होते. दरम्यान, अक्कूसह चौघांना न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते. येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने आरोपींना दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच जमाव लाकडी दार तोडून न्यायालयात घुसला होता. जमावाने आधी अक्कूच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली होती. त्यानंतर शस्त्राने वार करून व दगडाने ठेचून त्याचा जागीच मुडदा पाडला होता. त्याच्यावर शस्त्रांनी भोसकण्याचे ७३ घाव होते. सरकारविरोधी दहशतीचा कट जमावाने कायदा हातात घेऊन न्यायालयात पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला ठार मारले होते. गुन्हेगारी कट करणे, गुन्हेगारी बल प्रयोगाद्वारे सरकारविरोधी दहशत माजवण्याचा कट करणे, बेकायदेशीर जमाव तयार करून खून करणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद करून सीआयडी पोलिसांनी एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेद करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत यांच्यासह २१ जणांना अटक केली होती. त्यात सात महिलांचा समावेश होता.आरोपींपैकी सुमेद करवाडे, भागीरथा अडकिणे आणि अंजना बोरकर यांचे निधन झाले असून केवळ १८ आरोपीच आता कायम आहेत. आॅक्टोबर २०१२ पासून या खून खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होऊन आतापर्यंत १३ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आलेल्या आहेत. पुढची सुनावणी १६ आॅगस्ट आहे.