शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

एका दहशतीचा अंतच...

By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST

संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला.

अक्कू यादवचा खात्मा : न्यायालयातील थराराला दहा वर्षे पूर्णराहुल अवसरे - नागपूर संतापलेल्या जमावाने न्यायालयात पोलिसांच्या हातकडीतील कुख्यात भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याचा खात्मा केला. त्याबरोबरच नागपूरच्या एका कोपऱ्यातील दहशतीचा कायमचा अंत झाला. संपूर्ण देशात बहुचर्चित ठरलेल्या या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.१३ आॅगस्ट २००४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये ही थरारक घटना घटना घडली होती. जरीपटक्यातील कस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही कायदा मोडून तो गुन्हेगारीत सक्रिय होता. ७ आॅगस्ट २००४ ही त्याची अखेरची अटक ठरली. ८ आॅगस्ट रोजी त्याला न्यायालयात आणण्यात आले असता, त्याचाच एक साथीदार बिपीन बालाघाटी हा त्याला भेटण्यास आला होता. कपडे व टिफीनच्या आड तो अक्कूला चाकू देत असताना पकडल्या गेला होता. त्यानंतर अक्कूला १० आॅगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच दिवशी त्याच्या खात्म्याची योजना होती. परंतु ती तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादवमुळे फिसकटली होती. १३ आॅगस्ट रोजी अक्कू आणि आणखी तीन आरोपींना हातकड्यांमध्ये हेड कॉन्स्टेबल दामोदर चौधरी यांच्यासह तीन पोलिसांनी न्यायालयात आणले होते. त्याच वेळी २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांचा संतप्त जत्था अक्कूच्या दिशेने सरसावला होता. अक्कू आणि साथीदारांना आत घेऊन पोलिसांनी दगडी इमारतीचे चॅनल गेट बंद केले होते. दरम्यान, अक्कूसह चौघांना न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते. येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने आरोपींना दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच जमाव लाकडी दार तोडून न्यायालयात घुसला होता. जमावाने आधी अक्कूच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली होती. त्यानंतर शस्त्राने वार करून व दगडाने ठेचून त्याचा जागीच मुडदा पाडला होता. त्याच्यावर शस्त्रांनी भोसकण्याचे ७३ घाव होते. सरकारविरोधी दहशतीचा कट जमावाने कायदा हातात घेऊन न्यायालयात पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला ठार मारले होते. गुन्हेगारी कट करणे, गुन्हेगारी बल प्रयोगाद्वारे सरकारविरोधी दहशत माजवण्याचा कट करणे, बेकायदेशीर जमाव तयार करून खून करणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद करून सीआयडी पोलिसांनी एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेद करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत यांच्यासह २१ जणांना अटक केली होती. त्यात सात महिलांचा समावेश होता.आरोपींपैकी सुमेद करवाडे, भागीरथा अडकिणे आणि अंजना बोरकर यांचे निधन झाले असून केवळ १८ आरोपीच आता कायम आहेत. आॅक्टोबर २०१२ पासून या खून खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होऊन आतापर्यंत १३ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आलेल्या आहेत. पुढची सुनावणी १६ आॅगस्ट आहे.