शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

..अन् उलगडला पुनर्जन्माचा प्रवास

By admin | Updated: August 16, 2014 23:39 IST

मुंबईहून पुण्याला येत असताना रात्रीच्या वेळी अचानक झालेला मोठा अपघात..

पुणो : मुंबईहून पुण्याला येत असताना रात्रीच्या वेळी अचानक झालेला मोठा अपघात.. गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला परत पाठवून मिळवलेला पुर्नजन्म.. मदतीला धावून आलेले असंख्य हात.. रुग्णालयामधून घरी परतल्यानंतर त्यातून खंबीरपणो उभे राहण्याचा प्रवास उलगडला. निमित्त होते व्यावसायिक अशोक नवाल यांच्या मुलाखतीचे. त्यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये नवाल यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. ते ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
आनंदयात्री प्रकाशनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये अशोक नवाल यांनी लिहलेल्या ‘रिबॉन अॅट 54’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सह्याद्री रुग्णालयाचे संचालक डॉ. चारू आपटे, सुधीर गाडगीळ, अशोक नवाल, चित्र नवाल, सुशील नवाल उपस्थित होते.
डॉ. चारू आपटे म्हणाले, ‘‘नवाल हे 52 दिवस रुग्णालयामध्ये होते. या कालावधीमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणारे किमान चार फोन तरी यायचे. आमची टीम तर प्रयत्न करीत होतीच; त्याचबरोबर नवाल याच्या परिवाराची खंबीर साथ  व त्यांची इच्छाशक्ती याचा मोठा हातभार लागला.’’ 
सुशील नवाल यांनी प्रास्ताविक केले. बिझसोल ग्रुपचे व्यंकटाचलम् यांनी आभार मानले.        (प्रतिनिधी) 
 
अपघातानंतरचा प्रवास 
4मुंबईतील काम आटोपून 17 जून 2क्क्9 रोजी रात्री अशोक नवाल पुण्याला परतत होते. पुण्यापासून 2क्-25 किलोमीटर अंतरावर असताना एका टेम्पोचालकाच्या चुकीमुळे नवाल यांच्या मोटारीला मोठा अपघात झाला. मोटारीमध्ये पाठीमागच्या सीटवर झोपलेले नवाल अपघानंतर आतमध्ये चेंबले जाऊन गंभीर जखमी झाले. मोटारीमध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये वाहनचालकाने नवाल यांच्या पत्नीला व मित्रंना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतरचा नवाल यांचा प्रवास या पुस्तकात आला आहे.  
 
 ‘भीषण अपघातातून पुनर्जन्म झाला, तो फक्त माणसातल्या माणुसकीमुळेच. या स्वार्थी जगामध्येही चांगली माणसे आहेत म्हणून हे जग खूप चांगलं आहे. सहानुभूतीपेक्षा कर्तव्यबुद्धीने मदत करणारी माणसे भेटली. त्यांचे अनुभव पुस्तकरूपाने जगासमोर आणून त्यातून  इतरांना प्रेरणा मिळावी, हाच या लेखनामागचा हेतू होता.
                                  - अशोक नवाल,
                        लेखक, ‘रिबॉन अॅट 54’ 
 
आपल्यावर कितीही संकटे आली, तरी इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्यातून बाहेर पडू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अपघानंतरचा अशोक नवाल यांचा प्रवास होय.
- विद्याधर पानट, 
ज्येष्ठ पत्रकार