शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संस्थांतील कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांपासून बसून पगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 02:19 IST

राज्यावर कर्जाचे डोंगर असल्याने, सरकार काटकसरीचे धोरण अवलंबित असताना, शिक्षण विभागाला मात्र त्याचे काही देणे-घेणे नसल्याची बाब समोर आली आहे.

- जमीर काझीमुंबई : राज्यावर कर्जाचे डोंगर असल्याने, सरकार काटकसरीचे धोरण अवलंबित असताना, शिक्षण विभागाला मात्र त्याचे काही देणे-घेणे नसल्याची बाब समोर आली आहे. कालबाह्य झाल्याने बंद केलेल्या संस्थातील अधिकारी-कर्मचा-यांचे अन्य ठिकाणी समायोजन करावे, असे राज्य सरकारने स्पष्ट आदेश देऊनही शिक्षण आयुक्तांनी चार महिन्यांपासून त्याकडे लक्ष न दिल्याने राज्यभरातील विविध नऊ कार्यांलयातील आस्थापना वर्ग काहीही काम न करता, बसून वेतन घेत आहे.केवळ कार्यालयात हजर राहिल्याबद्दल सरकार दर महिन्याला पगार व भत्याच्या रूपातून या विविध ३६ पदांवर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करीत आहे. राज्यातील शाळांतील अद्यापनाचा दर्जा सुधारावा, यासाठी सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या योजनेंतर्गत महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून सुरू होता. त्यानुसार, सद्यपरिस्थितीत कालबाह्य असलेल्या शैक्षणिक तंत्रज्ञान व व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था बंद करण्याचे ठरले. विद्या प्राधिकरणाने या वर्षी २१ मार्चला शिक्षण विभागाला दिलेल्या प्रस्तावानुसार, राज्य सरकारने नऊ संस्था बंद करण्याबाबत १२ जूनला त्याबाबत अद्यादेश काढला. तेथील कर्मचाºयांचे बदलीने अन्यत्र समायोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिली होती. मात्र, आजतागायत अधीक्षक दर्जाची तीन पदे वगळता क्लार्क, मूल्यमापन अधिकारी, पाठ्यलेखन सादरकर्ता, समुपदेशक आणि शिपाई या दर्जाची उर्वरित ३६ पदांवरील स्टाफ अद्यापही आहे त्याच ठिकाणी कायम आहे.ही कार्यालये बंदवरळीतील शैक्षणिक तंत्रज्ञान कक्ष, पुण्यातील महाराष्टÑ राज्य दृकश्रवण शिक्षण संस्था आणि विभागीय व्यवसाय व निवड संस्थेची नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर येथील कार्यालय बंद केली आहेत. मात्र, त्या ठिकाणचा अस्थापना वर्ग अद्यापही कायम आहे.मी या विभागात १५ सप्टेंबरला पदभार घेतलेला आहे, त्यामुळे याविषयाची मला पूर्ण माहिती नाही. त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू.- सुरेश माळी(उपसंचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे.)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र