शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कर्मचारी अजून निवडणूक कामात

By admin | Updated: November 8, 2014 04:02 IST

निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़

मुंबई : निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़ याचा फटका नागरी सेवांना बसत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या अशा ४ हजार कामगारांना मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़विधानसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे ६ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकारी गुंतले होते़ अभियंता, शिक्षक, टेक्निशियन, अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने महत्त्वाच्या खात्यांचे कामकाज गेले महिनाभर रखडले होते़ मात्र निवडणूक हे राष्ट्रीय काम असल्याने पालिकेने निमूट आपला कर्मचारीवर्ग वॉर्डावॉर्डातून दिला होता़ मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला तरी निम्म्याहून अधिक कर्मचारी अद्याप परतलेले नाहीत़ याचा फटका प्रामुख्याने आरोग्य खाते, मालमत्ता कर, पर्जन्य जलवाहिन्या आदी विभागांच्या दैनंदिन कामकाजाला बसला आहे़ त्यामुळे निवडणुकीचे काम आटोपले असल्याने सर्व पालिका कर्मचाऱ्यांना ड्युटीतून मोकळे करण्याची मागणी प्रशासनाने शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़आणखी महिनाभराची प्रतीक्षानिवडणुकीचा निकाल लागला तरी अद्याप निवडणूक आयोगाचे काम संपलेले नाही़ तरी बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले असून, काही ठरावीक चमूलाच ठेवण्यात आले आहे़ निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाची बेरीज लागल्यानंतरच उर्वरित कर्मचारी सोडण्यात येतील़ यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)