शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मुंबई सेंट्रल आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: May 5, 2015 01:51 IST

सध्या एसटीचा गर्दीचा काळ सुरू झाला असून, या काळात एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाजवळील आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे

मुंंबई : सध्या एसटीचा गर्दीचा काळ सुरू झाला असून, या काळात एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाजवळील आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई सेंट्रल आगारात वाहतूक निरीक्षकांच्या जागा रिक्त असून, आगार प्रमुखांकडूनच वाहतुकीचा गाडा पुढे हाकलण्यात येत आहे. एसटीचा राज्यात मोठ्या प्रमाणात पसारा असून, वर्षाला जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन करताना त्यांचा प्रवास व्यवस्थित होण्यासाठी राज्यात सव्वा लाख एसटीचे कर्मचारी आहेत. सध्या चालकांवर पडणारा कामाचा ताण पाहता महामंडळाकडून कनिष्ठ चालकांची भरतीही केली जात आहे. मात्र असे असले तरी एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांची कुठे ना कुठेतरी कमतरता भासत आहे. गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडल्या जातात आणि या वेळी नियोजन करताना राज्यातील आगार प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांची धांदल उडत असते. काही वेळेला तर कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही आगार आणि एसटी स्थानकातील कर्मचारी अपुऱ्या मनुष्यबळातच काम करीत असतात. मात्र याकडे एसटी महामंडळाचे लक्षही जात नाही. हीच परिस्थिती मुंबई सेंट्रल आगारातील असून, बाजूला मुख्यालय असूनही अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष न जाणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या मुंबई सेंट्रल आगारात तीन वाहतूक निरीक्षक पदाच्या रिक्त जागा आहेत. या आगारात एक आगारप्रमुख आणि साहाय्यक आगारप्रमुख असून त्यांच्याकडूनच वाहतुकीचे नियोजन केले जाते. या आगारासाठी वाहतूक निरीक्षकाच्या जागा मंजूर असूनही गेल्या काही महिन्यांपासून त्या भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई सेंट्रल आगारात वाहतुकीचे नियोजन करताना बराच गोंधळ उडत आहे. गर्दीच्या काळात सध्या नियमित बसेस सोडण्याबरोबरच ६८६ जादा बसेसही महामंडळाकडून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक १७७ आणि त्यानंतर मुंबईतून १७0 जादा बसेस सोडण्यात आल्या असून, उर्वरित जादा बसेस औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागातून सोडण्यात आल्या आहेत. मुख्यालयाजवळील आगाराची ही परिस्थिती असतानाही त्याकडे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष न जाणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे.