शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

मुंबई सेंट्रल आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: May 5, 2015 01:51 IST

सध्या एसटीचा गर्दीचा काळ सुरू झाला असून, या काळात एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाजवळील आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे

मुंंबई : सध्या एसटीचा गर्दीचा काळ सुरू झाला असून, या काळात एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयाजवळील आगारातच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई सेंट्रल आगारात वाहतूक निरीक्षकांच्या जागा रिक्त असून, आगार प्रमुखांकडूनच वाहतुकीचा गाडा पुढे हाकलण्यात येत आहे. एसटीचा राज्यात मोठ्या प्रमाणात पसारा असून, वर्षाला जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन करताना त्यांचा प्रवास व्यवस्थित होण्यासाठी राज्यात सव्वा लाख एसटीचे कर्मचारी आहेत. सध्या चालकांवर पडणारा कामाचा ताण पाहता महामंडळाकडून कनिष्ठ चालकांची भरतीही केली जात आहे. मात्र असे असले तरी एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांची कुठे ना कुठेतरी कमतरता भासत आहे. गर्दीच्या काळात एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडल्या जातात आणि या वेळी नियोजन करताना राज्यातील आगार प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांची धांदल उडत असते. काही वेळेला तर कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही आगार आणि एसटी स्थानकातील कर्मचारी अपुऱ्या मनुष्यबळातच काम करीत असतात. मात्र याकडे एसटी महामंडळाचे लक्षही जात नाही. हीच परिस्थिती मुंबई सेंट्रल आगारातील असून, बाजूला मुख्यालय असूनही अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष न जाणे ही दुर्दैवी बाब आहे. सध्या मुंबई सेंट्रल आगारात तीन वाहतूक निरीक्षक पदाच्या रिक्त जागा आहेत. या आगारात एक आगारप्रमुख आणि साहाय्यक आगारप्रमुख असून त्यांच्याकडूनच वाहतुकीचे नियोजन केले जाते. या आगारासाठी वाहतूक निरीक्षकाच्या जागा मंजूर असूनही गेल्या काही महिन्यांपासून त्या भरण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई सेंट्रल आगारात वाहतुकीचे नियोजन करताना बराच गोंधळ उडत आहे. गर्दीच्या काळात सध्या नियमित बसेस सोडण्याबरोबरच ६८६ जादा बसेसही महामंडळाकडून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक १७७ आणि त्यानंतर मुंबईतून १७0 जादा बसेस सोडण्यात आल्या असून, उर्वरित जादा बसेस औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर विभागातून सोडण्यात आल्या आहेत. मुख्यालयाजवळील आगाराची ही परिस्थिती असतानाही त्याकडे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे लक्ष न जाणे म्हणजे दुर्दैवी बाब आहे.