शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल!

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 6, 2026 08:04 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली.

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. त्यानंतर टँकरमधील वायू गळती रोखण्यात प्रशसनाला अपयश आल्याने तब्बल अडीच दिवस वाहतूक ठप्प झाली. यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न-पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागले.  

द्रुतगती मार्गावर आपत्कालीन यंत्रणाच सक्षम नसल्याची बाब आता अधोरेखित झाली आहे. ‘आयआरबी’च्या यंत्रणेने या समस्येसमोर हात टेकल्यानंतर महामार्ग पोलिसांनी ‘बीपीसीएल’ कंपनीकडे मदत मागितली असता, त्यांनी गॅस गळती रोखली. या अडीच दिवसांत कोंडीत अडकून पडलेल्या प्रवाशांच्या झालेल्या जाचातून प्रशासन बोध घेईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पर्यायी सुविधा आवश्यक

महामार्गावर ज्वलनशील पदार्थांची हाताळणी करणाऱ्या यंत्रणेसह कोंडीत अडकलेल्यांना सुरुवातीच्या काही तासांतच बाहेर काढण्याची उपाययोजना नसल्याचेही दिसून आले. कळंबोली ते देहूरोड या ९४ किलोमीटरच्या अंतरात आपत्कालीनप्रसंगी वाहने दुसऱ्या मार्गिकेवर वळवण्यासाठी दोन्ही मार्गांत ठिकठिकाणी मार्ग आवश्यक आहेत.

‘आयआरबी’ने साधली संधी

आडोशी बोगद्याजवळ अपघातामुळे कोंडी झाल्याचे माहीत असतानाही टोलनाक्यावरून पुणेकडून मुंबईला जाणारी वाहने सोडल्याने कोंडी वाढली. टोलनाक्यावरूनच वाहनांना अपघाताची कल्पना देऊन परत पाठवले असते तर हजारो प्रवाशांचे हाल टळले असते. मात्र, ‘आयआरबी’ने  टोल आकारून वाहने पुढे पाठवली. शिवाय कोंडीतून सुटून परत जातानाही टोल आकारून कमाई  केली.

अपघातानंतर ‘आयआरबी’च्या यंत्रणेकडे गॅस गळती रोखण्याची सक्षम यंत्रणा नव्हती. परिणामी एका संस्थेच्या माध्यमातून ‘बीपीसीएल’च्या पथकाला बोलवण्यात आले. त्यांनी गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास गॅस गळती रोखल्यानंतर अपघातग्रस्त टँकर हटवून वाहतूक सुरू करण्यात आली. तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस

दुसऱ्या दिवशी पाणी, बिस्कीट 

वाहतूककोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी लोणावळा, खंडाळा येथून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पाठवून अन्न-पाण्याची सोय करून देणे शक्य होते.मात्र, त्याकडे यंत्रणेचे लक्ष न गेल्याने महामार्ग पोलिसांना आपण त्यासंबंधीची कल्पना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी, बिस्कीट पुरवले गेल्याचे रस्ता सुरक्षा अभियानाचे वक्ते विनय मोरे यांनी सांगितले.

ठाण्यात दूध संपले, भाजीपाला टंचाईशी झाला सामना 

द्रुतगती मार्गावरील गॅस टँकर अपघातानंतर झालेल्या वाहतूककोंडीमुळे ठाण्यातील दूध पुरवठ्यावर गुरुवारी परिणाम झाला. या शहरात सुमारे ५० टक्के दूध कमी प्रमाणात उपलब्ध झाले. सकाळी ११ नंतर अनेकांना दूध न मिळाल्याने दुकानातून माघारी फिरावे लागले. तर, भाजीपाला पुरवठ्यावरही परिणाम झाला. गोकुळ आणि वारणाच्या दुध वितरणावर सर्वाधिक परिणाम झाला. तर चितळे डेअरीचे दूध ठाण्यात आले नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा दूध विक्रेते कल्याणकारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली. वसई-विरार परिसरात दुधाचा पुरवठा तुलनेने सुरळीत होता. शुक्रवारी दूध पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. भाजीपाला पुरवठ्यावरही परिणाम झाला होता. नाशिकमधून येणाऱ्या भाज्यांचा पुरवठा सुरळीत होता, असे भाजी विक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Expressway Emergency System Exposed After Gas Tanker Accident

Web Summary : A gas tanker accident on the Mumbai-Pune Expressway caused unprecedented traffic jams lasting two and a half days. The incident exposed the expressway's inadequate emergency response, leaving commuters stranded without basic necessities. 'IRB' prioritized toll collection over commuter assistance during the crisis.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईPuneपुणे