शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पुण्यात विविध संघटनांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 05:02 IST

समर्थनार्थही निघाले मोर्चे; नाशिकमध्ये मानवी साखळी करून दर्शविला पाठिंबा

पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए, एनआरसी या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी रविवारी पुण्यात ‘कुल जमाते तंजीम’ संघटनेच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला़ यामध्ये मुस्लिम समाजासह अन्य संघटना व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़संविधान समर्थनार्थ घोषणा देत मोर्चाची सुरूवात सकाळी अकरा वाजता गोळीबार मैदान येथून झाली. दुपारी २ च्या सुमारास विधान भवन येथे हा मोर्चा आला़ हातात तिरंगी झेंडे घेत व ‘संविधान बचाव’च्या घोषणा देत मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला़ मोर्चा सेव्हन लव्ह चौकातून, नेहरू रस्ता, मालधक्का चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे आला़ त्यानंतर सीएए, एनआरसी विरोधातील निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यात आले.यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी हर्ष मंगल, नीरज जैन आदी मान्यवरांनी सीएए व एनआरसीला विरोध करीत, देशातील एकात्मता टिकविण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.सीएए कायद्याचे विरोधकांकडून राजकारण; संजय धोत्रेंचा आरोपअकोला : सीएए, एनआरसी कायद्यामुळे कोणत्याही समुदायाचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही. सीएए कायद्याचे समर्थन करणे हाच विरोधकांचे तोंड बंद करण्याचा एकमेव मार्ग आहे. सीएए कायद्याचे राजकारण करून विरोधक गैरसमज पसरवित आहेत. परंतु प्रत्येक नागरिक सीएएचे समर्थन करत आहे. सीएएच्या समर्थनार्थ नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे आयोजित रॅलीप्रसंगी व्यक्त केले.राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ रविवारी मुंगीलाल बाजोरिया प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे आदी उपस्थित होते.नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार झाले. पाकिस्तानमधील हिंदू, शीख समुदायाचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांचे धर्मांतर करण्यात आले; परंतु भारतात अल्पसंख्याक सुरक्षित आहेत. आम्ही राष्ट्रासोबत उभे राहणारे लोक आहोत. राष्ट्राच्या नावाने राजकारण करणारे नाहीत. या तीन देशांमधील अल्पसंख्याक धर्माच्या लोकांना भारत नागरिकत्व देण्यास तयार आहे. अतिथी देवो भव: ही आमची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपच्या राज्यांतच जाळपोळ - खालीदयावेळी आयोजित सभेत जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालीद यांनी भाजपवर निशाणा साधत मोर्चाला संबोधित केले़ सीएए आणि एनआरसी कायद्यानंतर, देशभरात अनेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. मात्र ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्याच ठिकाणी दंगल घडविण्याचे काम भाजपकडून करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला़ सीएए व एनआरसीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी व अमित शहा यांना सावरकर, मोहम्मद जिना यांच्या विचाराचा हिंदुस्तान बनवायचा आहे़ मात्र आमचा त्याला विरोध असून, आम्हाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेला देश हवा आहे, संघीस्थान नको असेही ते म्हणाले़वरूडमध्ये रॅलीसुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वरुड (जि. अमरावती) शहरातून महारॅली काढण्यात आली. मराठी शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या या महारॅलीत हजारो नागरिक, व्यापारी सहभागी झाले. हातात भगवे झेंडे आणि तिरंगा घेऊन, वंदे मातरमच्या जयघोष करण्यात आला.नाशिकमध्ये १६ ठिकाणी मानवी साखळीकायद्याच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये प्रबोधन मंचच्या वतीने १६ ठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक