शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

स्वतंत्र्य विदर्भाच्या मागणासीठी एल्गार

By admin | Updated: May 1, 2017 17:35 IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 1 - वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी आपला निषेध व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली. दुसरीकडे अखंड महाराष्ट्रवाद्यांनीदेखील महाराष्ट्रदिनाचा जल्लोष केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही तुरळक घटना वगळता एकूणच १ मेचा दिवस शांततेत पार पडला.
 
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’ येथे सकाळी ९ वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी विविध विदर्भवादी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी यासारख्या विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने वामनराव चटप, अ‍ॅड.अनिल किलोर, हरिभाऊ केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय कर्णिक, अ‍ॅड.मुकेश समर्थ, संदेश सिंगलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.  तर सकाळी साडेनऊच्या सुमारास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गिरीपेठ येथील कार्यालयाजवळ वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
 
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने
दरम्यान, काही विदर्भवाद्यांनी धरमपेठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ राज्य शासनाविरोधात निदर्शने केली. भाजपाने विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत अवघ्या मिनिटाभरातच ७ ते ८ आंदोलकांना ताब्यात घेतले.
 
हिंसा करायची नाही : श्रीहरी अणे 
भाजपाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचे पालन केले नाही. त्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. ही दुर्दैवी बाब आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. विदर्भासाठी अशी हिंसा आम्हाला नको आहे. मात्र कुणी आमच्याविरोधात हिंसा केली तर त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागेल, या शब्दांत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 
अ‍ॅड.अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगरातील ‘विष्णू की रसोई’ येथे सकाळच्या सुमारास वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. तसेच त्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत ‘विरा’तर्फे ‘रक्ताक्षरी’ या मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.
देशात विदर्भाची निर्मिती करण्याची क्षमता केवळ एकाच नेत्यात आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यासमोर इतर कुठल्याही नेत्याला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा लढा पोहोचणे गरजेचे आहे. यासाठीच १० हजार विदर्भवादी आपल्या रक्ताने स्वाक्षरी केलेले पत्र त्यांना पाठवून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबतच्या आश्वासनाची आठवण करुन देणार आहेत, असे अ‍ॅड.अणे यांनी यावेळी सांगितले.
 
‘रक्ताक्षरी’ मोहिमेला नागपुरातून प्रारंभ
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसंदर्भात ‘विरा’तर्फे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निवेदन देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात येणाºया पत्रावर विदर्भवादी स्वत:च्या रक्ताचा अंगठा लावणार आहेत. काळा दिवस पाळत असताना अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी मेहाडिया चौकात आयोजित कार्यक्रमादरम्यान रक्ताने स्वाक्षरी या मोहिमेची सुरुवात केली.  विदर्भातून १० हजार विदर्भवादी रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन पंतप्रधानांना पाठविणार आहेत.