शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार!

By admin | Updated: June 6, 2017 01:26 IST

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया : शिक्षण विभागाने सोमवारी पाठविला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: येत्या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला होता; परंतु यंदा केंद्रीय प्रवेशाचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येत आहे. पुणे येथील शिक्षण संचालकांनी शहरातील कनिष्ठ महविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश राबविण्याबाबत अद्याप परवानगी दिली नाही. दहावीचा निकाल तोंडावर असताना, माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी शिक्षण संचालकांकडे पाठविला. त्यामुळे यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश होणार नसल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा अकोला शहरातसुद्धा राबविण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला होता. त्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थी संख्या, महाविद्यालयाचे नाव, पत्ता आणि पदसंख्या याची माहिती मागविली होती. ग्रामीण भागासह परजिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. ही बाब लक्षात घेता, शिक्षण विभागाने अकोल्यातसुद्धा आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शिक्षण संचालकांनी केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश राबविण्यास परवानगी दिली नाही. दहावीचा निकाल जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात परवानगी न मिळाल्यामुळे यंदा अकरावीचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने सोमवारी केंद्रीय पद्धतीने प्रवेश राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविला; परंतु प्रस्तावाला शिक्षण संचालकांनी परवानगी दिली नाही तर प्रवेश रखडतील, अशी भीती व्यक्त होत आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना फायदाशिक्षण संचालकांनी अकोला शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिली नाही तर त्याचा फायदा कनिष्ठ महाविद्यालय आणि शहरातील काही शिकवणी वर्ग संचालकांना होणार आहे. केंद्रीय पद्धतीला आधीपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी विरोध दर्शविला होता. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया नसल्यास, कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांची विक्री करून आणि मनमानी पद्धतीने डोनेशन उकळून प्रवेश प्रक्रिया राबवतील. विद्यार्थी संघटना आक्रमकशहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यासंदर्भात अभाविप, एनएसयूआय या विद्यार्थी संघटना आग्रही होत्या. त्यासाठी या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनसुद्धा केले; परंतु शहरात यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नसल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. केंद्रीय पद्धतीनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात परवानगीचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला. त्यासाठी शिक्षण संचालकांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. - आत्माराम राठोड, सहायक शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग