शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार!

By admin | Updated: June 6, 2017 01:26 IST

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया : शिक्षण विभागाने सोमवारी पाठविला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: येत्या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला होता; परंतु यंदा केंद्रीय प्रवेशाचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येत आहे. पुणे येथील शिक्षण संचालकांनी शहरातील कनिष्ठ महविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश राबविण्याबाबत अद्याप परवानगी दिली नाही. दहावीचा निकाल तोंडावर असताना, माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी शिक्षण संचालकांकडे पाठविला. त्यामुळे यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश होणार नसल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा अकोला शहरातसुद्धा राबविण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला होता. त्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थी संख्या, महाविद्यालयाचे नाव, पत्ता आणि पदसंख्या याची माहिती मागविली होती. ग्रामीण भागासह परजिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. ही बाब लक्षात घेता, शिक्षण विभागाने अकोल्यातसुद्धा आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शिक्षण संचालकांनी केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश राबविण्यास परवानगी दिली नाही. दहावीचा निकाल जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात परवानगी न मिळाल्यामुळे यंदा अकरावीचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने सोमवारी केंद्रीय पद्धतीने प्रवेश राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविला; परंतु प्रस्तावाला शिक्षण संचालकांनी परवानगी दिली नाही तर प्रवेश रखडतील, अशी भीती व्यक्त होत आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना फायदाशिक्षण संचालकांनी अकोला शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिली नाही तर त्याचा फायदा कनिष्ठ महाविद्यालय आणि शहरातील काही शिकवणी वर्ग संचालकांना होणार आहे. केंद्रीय पद्धतीला आधीपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी विरोध दर्शविला होता. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया नसल्यास, कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांची विक्री करून आणि मनमानी पद्धतीने डोनेशन उकळून प्रवेश प्रक्रिया राबवतील. विद्यार्थी संघटना आक्रमकशहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यासंदर्भात अभाविप, एनएसयूआय या विद्यार्थी संघटना आग्रही होत्या. त्यासाठी या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनसुद्धा केले; परंतु शहरात यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नसल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. केंद्रीय पद्धतीनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात परवानगीचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला. त्यासाठी शिक्षण संचालकांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. - आत्माराम राठोड, सहायक शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग