शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ फेरी होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:54 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबित प्रक्रियेमुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रांतील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेऱ्यांचे आयोजन करण्याला मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबत अध्यादेश काढला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबित प्रक्रियेमुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले. त्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी रद्द करण्यात आली. मात्र विशेष फेरीस होणारा विलंब आणि प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे एफसीएफएस फेरीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबत नवा अध्यादेश काढला. त्यामुळे उर्वरित प्रवेशास ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

दुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेशांना मुदतवाढदुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुंबई विभागातून २१,८३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तर प्रवेश निश्चितीस ८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळ वाढवून मागितल्याने ८ जानेवारीपर्यंत त्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ पर्यंत आपले दुसऱ्या फेरीचे प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालय