शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:58 IST

Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १० नागरिकांसह नौदलाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीची धडक बसून आज संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १० नागरिकांसह नौदलाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एलिफंटाजवळ झालेल्या दुर्घटनेबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईजवळील समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ आज ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. संध्याकाळी ७.३० पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामधून आतापर्यंत १०१ जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आणि ३ नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस यांना ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून बचाव कार्य करून वेगाने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत सापडलेल्यांपैकी आणखी कुणी बेपत्ता आहे का, याबाबत अद्यापही अंतिम माहिती मिळालेली नाही. सकाळपर्यंत याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

दरम्यान, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसindian navyभारतीय नौदल