शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

इलेक्ट्रॉनिक्स शाखेला मिळेनात विद्यार्थी!

By admin | Updated: June 17, 2017 14:52 IST

बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे.

- मयूर देवकर/ ऑनलाइन लोकमत

 
औरंगाबाद, दि. 17 - बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी या दोन अभियांत्रिकी शाखांना गेल्या वर्षी औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात थंड प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांमध्ये तर एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील पाच ते सहा महाविद्यालयांनी या शाखेतील प्रवेश थांबवावे अशी मागणी तंत्र शिक्षण संचालनालयाकडे केली आहे.
 
औरंगाबाद शहराचा विचार केला असता गेल्या वर्षी येथील दहा महाविद्यालयामध्ये  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन शाखेच्या ७४२ जागांपैकी केवळ १४१ जागा सामान्य प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (कॅप राउंड ४) भरल्या गेल्या. म्हणजे ६०१ जागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामध्ये मॅनेजमेंटच्या जागा गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. एकेकाळी विद्यार्थी आणि पालकांची आवड असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेची झळाळी अशी उतरावी हे बदलत्या काळाचे सूचक आहे.
एकूण अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच मोठे बदल होत आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्याच जात नाही. मागच्या चार वर्षांत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली आहे. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हील, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकिच्या प्रमुख शाखा म्हणून ओळखल्या जातात. किमान मराठवाड्यात तरी प्रवेश संख्येत घट होण्याचा सर्वात मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स शाखेला बसला आहे.
 
शहर व परिसरातील हाय-टेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या दोन महाविद्यालयांमध्ये मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रत्येकी ६० जगांवर कॅप राऊंडद्वारे एकही प्रवेश झाला नाही. जीएसएमच्या एमआयटी कॉलेजमध्ये तर १८० पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या. पीईएसमध्ये ५२ तर देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १८० पैकी ८५ जागा रिकाम्या राहिल्या.
 
रोजगार घटला, प्रवेश घटले
‘अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदे’च्या आकडेवारीनुसार केवळ ४० टक्के इंजिनिअर्स नोकरी मिळण्याच्या पात्रता योग्य आहेत. महाराष्ट्रात तर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा रोजगार दर केवळ ३५ टक्के आहे. म्हणजे ६५ टक्के विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकऱ्यांची संख्या घटल्याने बेरोजगारी वाढली आणि त्यामुळेच प्रवेशसंख्येत घट झाली. तसेच सध्याचा अभ्यासक्रम झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत कित्येक वर्ष मागे आहे. यामुळे कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यात महाविद्यालये अपयशी ठरत आहेत.
 
इलेक्ट्रिकल आणि सिव्हीलला ‘अच्छे दिन’
विद्यार्थ्यांच्या प्राधान्य क्रमात सर्वात शेवटी राहणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांकडे आता ओढा वाढू लागला आहे. ऊर्जा क्षेत्रात होणारी मोठी उलथापालथ आणि बांधकाम व निर्मिती क्षेत्राची वाढलेली मागणी यामुळे या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमणात उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. म्हणजे नोकऱ्या जास्त आणि प्रशिक्षित उमेदवार कमी अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी दिसून येते.
 
 
कॅपच्या चौथ्या टप्प्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या प्रवेशांचे विवरण (२०१६-१७)
महाविद्यालय          प्रवेशरिकाम्या जागा    एकूण जागा
हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी       ०     ६०६०
श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पडारी गाव       ०     ४८४८
श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी     ३     २७३०
औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग                ४     ३९४३
साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ४     ३२३६
इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग ५     ४०४५
पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग          ८     ५२६०
छत्रपती शाहु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग          १२     ४८६०
जीएसएम मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी       १०     १७०१८०
देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग            ९५        ८५१८०