शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

वीज होणार स्वस्त, महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 07:03 IST

Electricity News: पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

मुंबई - कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

महावितरणचा ८५ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. इतर घटकांवर १५ टक्के    खर्च होतो. महावितरणला सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी दोन हजार मेगावॉट वीज उपलब्ध असून, नियोजन केल्यानुसार भविष्यात यात वाढ होईल, साहजिकच विजेचे दर कमी करणे शक्य होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे. नव्या प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना, हरकती दाखल करता येतील. 

वीज दर प्रस्तावासंदर्भातील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये होणार आहे. तसेच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्येही सुनावणी होणार आहे. 

औद्योगिक ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती सुरूच राहतील. दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळजवळ २ रुपये ४० रुपये सवलत मिळेल. विजेचे दर दरवर्षी ८ ते १० टक्के वाढणे अपेक्षित असते. मात्र, सौरऊर्जेमुळे पुढील पाच वर्षे विजेचे दर कमी होतील. त्यानुसार दर ९ रुपये ४५ रुपयांहून ९ रुपये १४ पैसे असा कमी होईल. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे पाच वर्षांत १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठीचे दर ५ रुपये ८७ पैसे प्रतियुनिटपर्यंत, तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११.८२ प्रतियुनिटपर्यंत कमी होतील.- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र