शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

खुल्या बाजारातून हवीय वीज

By admin | Updated: March 8, 2016 00:58 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीपेक्षा (महावितरण) खासगी वीज कंपनीची वीज ३ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे शहर औद्योगिक परिसरातील लघु व मध्यम उद्योग खुल्या बाजारातून

पिंपरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीपेक्षा (महावितरण) खासगी वीज कंपनीची वीज ३ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे शहर औद्योगिक परिसरातील लघु व मध्यम उद्योग खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यास उत्सुक आहेत. मात्र, कायद्यामुळे त्यास अडथळा येत असल्याने या उद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक वीज वापराचा सध्याचा दर ८ ते ११ रुपये आहे. कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, गोवा या राज्यांच्या तुलनेत हा दर जास्त आहे. तसेच, एक मेगावॉटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या लघु व मध्यम उद्योजकांना खुल्या बाजारातून वीज घेता येत नसल्यामुळे अनेक लघु व मध्यम उद्योग शेजारील राज्यात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शहरासह राज्यातील उद्योगांचे काम कमी झाल्यामुळे औद्योगिक मंदीची तीव्रता वाढली असल्याचे धक्कादायक चित्र आहे. राज्यातील ४६५ उद्योगांनी महावितरणकडून वीज घेणे बंद करून खुल्या बाजारातून वीज घेण्यास सुरुवात केली आहे.सध्या कायद्यानुसार एक मेगावॉटपेक्षा (१,३५९ ए.पी.) अधिक मागणी असलेल्या औद्योगिक ग्राहकांना खुल्या बाजारातून वीज घेण्याची मुभा आहे. त्यानुसार याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगांनाच मिळतो. लघु व मध्यम उद्योगांमध्ये वीजवापर ५० ते ४०० एपीपर्यंत असल्याने या उद्योगांना खुल्या बाजारातून वीज घेता येत नाही. यामुळे याचा फायदा या उद्योगांना होत नाही. एक मेगावॉटपेक्षा कमी ५० ते ४०० एचपीपर्यंत वीजवापर असणाऱ्या उद्योगांचे क्लस्टर तयार करून त्यांनाही खुल्या बाजारातून वीज घेण्याची परवानगी द्यावी. याकरिता सध्याच्या कायद्यात बदल करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेने केली आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे उद्योजक त्रस्त आहेत. जुन्या इन्फास्ट्रक्चरमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, झाकण नसलेले उघडे डीपी बॉक्स, त्याबाबत महावितरणची अनास्था, अपुरा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, वेळेत उपलब्ध न होणारे आवश्यक साहित्य आदी कारणांमुळे वीज वारंवार खंडित होते. यामुळे महावितरणचे उत्पन्न घटते. महावितरण स्वत:च्या सेवेत सुधारणा न करता एकाधिकारशाहीमुळे दरवाढ करून कमी झालेले उत्पन्न भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यापेक्षा स्वत:च्या सेवा अद्ययावत करून वीजचोरी आणि गळती कमी करून स्पर्धेत उतरल्यास महावितरणला ग्राहक गमवावे लागणार नाहीत. तसेच, महावितरणने सुधारणा केल्यास राज्यातील उद्योगांचा परराज्यांकडे वाढलेला कल कमी होईल, अशा अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत वीज दरासंदर्भात मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. बैठकीत वीज दर कमी करण्याची मागणी केली असता, बावनकुळे यांनी दिवसा उद्योग चालवण्यापेक्षा रात्री उद्योग चालवा, विजेचे दर कमी करतो, असे सांगून वीज दर कमी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मात्र वीज दर कमी करण्यास नकार दिला. त्यामुळे उद्योजक नाराज आहेत. (प्रतिनिधी)